शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मेयोचे रुग्ण अर्धपोटी

By admin | Updated: July 9, 2016 03:02 IST

नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सकस आहारावरही प्रश्नचिन्ह : कर्मचाऱ्यांच्या संख्येवर ठरतो रुग्णांचा आहारनागपूर : नियमांना बगल देत पोषक आहाराऐवजी केवळ मोजकाच आहार दिला जात असल्याने मेयोच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ आली आहे. मेयोच्या पाकगृहात कर्मचाऱ्यांची तोकडी सोय व अद्ययावत यंत्रणा नसल्याने हा फटका बसत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. आजार लवकर आटोक्यात आणण्यासाठी रुग्णाला योग्य उपचारासोबत योग्य आहाराची गरज असते. रुग्णाला पौष्टिक आहार मिळाल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढून रुग्ण लवकर बरा होतो. सध्याच्या स्थितीत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो)३५० वर रुग्णांना सकाळच्या नाश्तासह दोन वेळचे जेवण दिले जाते. रुग्णांच्या जेवणात तूर किंवा मसुरीचे वरण, भात, भाजी, पोळी असा मेनू ठरलेला आहे. परंतु तटपुंज्या कर्मचाऱ्यांमुळे कधी एक पोळी तर कधी तीही मिळत नसल्याचे वास्तव आहे. भाजीच्या नावाखाली दुधी भोपळ्याची व लाल भोपळ्याची रस्सेदार भाजी दिली जात आहे. नावाला वरण असले तरी त्यात केवळ पाणीच राहत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. याला पोषक आहार म्हणावे का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, मेयोसारखीच मेडिकलच्याही पाकगृहाची स्थिती होती. येथेही कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांचा आहार अडचणीत आला होता. शासनही याकडे लक्ष देत नव्हते. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘रोटी मेकर’ यंत्र विकत घेतल्याने तूर्तासतरी यातून मार्ग काढण्यात त्यांना यश आले आहे. असेच यंत्र मेयोच्या पाकगृहात उपलब्ध झाल्यास मदत होऊ शकेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)चव नाहीच, ‘कॅलरीज’ तर दूरचशासनाने मेयोच्या पाकगृहाला चवीचे आणि कॅलरीजचे नियम घालून दिले आहेत. मधुमेह, क्षयरोगाचे रु ग्ण, जळालेले रुग्ण, लहान मुले आणि गर्भवती महिलांना डॉक्टरांच्या निर्देशानुसार हाय कॅलरीज फूड देण्याचा आणि हा आहार आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात तयार करण्याचा नियम आहे. वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचा ‘समाधानकारक’ असा शेरा जोवर मिळत नाही तोवर पाकगृहात तयार झालेला कुठलाही पदार्थ रु ग्णांना वितरित करता येत नाही. असे असतानाही, पोषक नसलेल्या मोजक्याच आहारावर ‘समाधानकारक’ शेरा दिला जात आहे. विशेष म्हणजे, आहराला चव राहत नाही ‘कॅलरीज’ तर दूरची गोष्ट असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.