शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

मेयो, मेडिकलमध्ये वाढले पक्षाघाताचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:41 IST

विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे.

ठळक मुद्देरोज येत आहेत तीन-चार रुग्ण : ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार मिळणे कठीण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चौथे मोठे कारण ठरले आहे. विदर्भात थंडीमध्ये वाढ होताच मेयो, मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. सकाळच्या वेळी येणाऱ्या या रुग्णांची संख्या मोठी आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयात ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीच्या उपचाराची उणीव असल्याचेही समोर आले आहे.शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे हा आजार होतो. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोरा जातो. तात्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) इतर दिवसात रोज एक-दोन पक्षाघाताचे रुग्ण येतात. अलिकडे थंडी वाढताच तीन-चार रुग्ण येत आहेत. डॉक्टरांच्या मते, थंडीमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या अखडतात. यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. हृदयावर ताण येऊन पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी,सकाळच्यावेळेत पक्षाघाताच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.‘गोल्डन अवर’चे नियोजनच नाहीपक्षाघाताची लक्षणे दिसताच चार ते पाच तासात उपचार मिळाल्यास या आजाराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपेत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. खासगी इस्पितळात या आजाराला घेऊन वेगळे ‘युनिट’ किंवा कार्यपद्धती असते. परंतु मेयो, मेडिकलमध्ये तसे नियोजन नसल्याचे चित्र आहे. विशेषत: रुग्णालयात आलेला रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च मंजूर व्हायलाच ४८ तासांचा वेळ लागतो. लाभार्थी रुग्ण नसेल तर तातडीने सिटी स्कॅन, चार तासाच्या आत दिले जाणारे सुमारे ४५ हजार रुपयांचे ‘टीपीए’ इंजेक्शन व इतरही उपचाराची सोय उपलब्ध असतेच असे नाही.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Healthआरोग्य