शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळालेल्या ३५ कोटींवर संक्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:18 PM

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे.

ठळक मुद्देएमआरआय, सिटीस्कॅन रखडणार ? श्री साईबाबा संस्थानने दिलेला निधी मागितला परत

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) सामाजिक जबाबदारी म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. विशेष म्हणजे, याच संस्थानने नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) एमआरआयसह सिटीस्कॅन व डीएसए खरेदी करण्यासाठी ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. परंतु सात महिन्यावर कालावधी होऊनही यंत्रसामुग्री खरेदी झाली नाही. यामुळे हा निधीही परत मागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मेयो प्रशासनाचे सलग पाच वर्षांपासून एमआरआय व सिटी स्कॅन खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबर २०१६ रोजी एमआरआय व सिटीस्कॅन खरेदी करण्यासाठी १८ कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली, परंतु आर्थिक तरतूद झाली नाही. यामुळे हे दोन्ही यंत्र कागदावरच राहिली. २०१७ मध्ये मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या निरीक्षणात निकषाप्रमाणे एमआरआय व ‘१६ स्लाईस सिटीस्कॅन’ नसल्याची त्रुटी काढली. पदवी व पदव्युत्तर जागा धोक्यात आल्या. यासंदर्भातील पत्रही मेयोला प्राप्त झाले. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. त्यांच्याच पुढाकारांमुळे श्री साईबाबा संस्थानने ३५ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मे २०१८ ला दिला. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हाफकिन महामंडळा’कडे वळता केला.सुरुवातीला काही महिने या निधीतून यंत्रसामुग्री खरेदीला मंजुरीच मिळाली नव्हती. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने १७ जूनच्या अंकात ‘३५ कोटी मिळूनही खरेदीच्या मंजुरीला ना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याच दरम्यान संस्थानने निधी देऊनही ‘एमआरआय’ स्थापन करण्यात आले नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे, याबाबतही गोंधळ उडाला आहे. यातच श्री साईबाबा संस्थानने यवतमाळ मेडिकलला एमआरआय खरेदीसाठी दिलेला १३ कोटींचा निधी खर्च झालेला नसल्याचे कारण समोर करीत निधी परत मागितला.तसे पत्र यवतमाळ मेडिकल अधिष्ठात्यांना प्राप्त झाले आहे. मेयोतही निधी देऊन महिनोन्महिने झाले असताना यंत्रसामग्रीची खरेदी झाली नाही. यामुळे श्री साईबाबा संस्थाही हा निधी परत मागण्याची शक्यता आहे. शासनाने आतातरी याला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य