शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

माऊली म्हणाले निवृत्तीनाथांना, मी समाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:19 IST

भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़

ठळक मुद्देहरिहरबुवा नातू यांनी गुंफले संजीवन समाधी कीर्तनराष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़  भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व्हावे, असा मानस मनाशी धरत ज्येष्ठ बंधू आणि गुरू निवृत्तीनाथांना त्याची माहिती दिली आणि निवृत्तीनाथ जरा थबकलेच़़ संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन रंगवताना मालवण येथील हभप हरिहरबुवा नातू यांनी ज्ञानदेवांच्या कार्याची माहिती प्रतिपादित केली़राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने महाल, चिटणीस पार्क स्टेडियमवरील  मुकुंदराज महाराज साधू कीर्तन परिसरात आयोजित राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हरिहरबुवा नातू यांचे कीर्तन झाले़ प्रमुख पाहुणे म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरूदास महाराज, साई मंदिर नागपूरचे संस्थापक विजयबाबा कोंड्रा, आ़ विकास कुंभारे, उद्योजक विलास काळे, भारत विकास परिषद विदर्भचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते़ रूपाली बक्षी यांनी गीत सादर केले़नातू म्हणाले़, मनातील देवाच्या अनुष्ठानासह अनुसंधान बांधण्याची गरज असून, ज्ञानेश्वरांनी २७ अभंगांचा हरिपाठ लिहिला आणि प्रत्येक अभंगात नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. परमेश्वराशी अनुसंधान जोडले तर कर्तव्यबुद्धी जागृत होते़ त्यातून कृतज्ञता भाव येतो आणि समर्पण वृत्ती वाढते़ समर्पण झाले की कृतार्थता येते़ याचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. निवेदन स्मिता खनगई यांनी केले़ भगतबुवांना मृदंगमवर श्रीधर कोरडे, तबल्यावर हर्ष पायघन, संवादिनीवर धनराज यावलकर, सतारवर नासीर खान आणि व्हायोलिनवर शिरीष भालेराव यांनी साथसंगत केली.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक