शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कोरोना काळात माता मृत्यूच्या प्रमाणात ७३ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ७३ टक्क्याने कमी झाले. मागील वर्षी १८७, तर त्यापूर्वी २५५ मातामृत्यूची नोंद होती. मात्र, सहा जिल्ह्यांपैकी भंडारा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यांत मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात १९९०मध्ये एक लाखांमागे ५५६ माता मृत्युदर होता. नुकत्याच झालेल्या ‘सॅम्पल सर्व्हे रजिस्ट्रेशन सर्व्हे’नुसार (एसआरएस) मागील तीन वर्षांत राज्यात माता मृत्युदर ६८ वरून ६१ नंतर ५५ आणि आता ४६ असा नोंदविण्यात आला आहे. यात पहिल्या क्रमांकावर केरळ (४३), महाराष्ट्र (४६), तामिळनाडू (६०), तेलंगाणा (६३), तर आंध्र प्रदेश (७४) राज्यांचा समावेश आहे. अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब, अ‍ॅनिमिया ही मातामृत्यूची मुख्य कारणे आहेत. यात ३८ टक्के मृत्यू प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे (पोस्टमार्टम हेमरेज) होतात. हे मृत्यू थांबविण्यास आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागपूर व वर्धा जिल्हा वगळता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील माता मृत्यूचे ‘ऑडिट’ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १०२ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल व डागा रुग्णलयात केवळ विदर्भच नाही तर शेजारच्या राज्यातील माता प्रसूतीसाठी येतात. यामुळे जिल्ह्यात माता मृत्यूचा दर इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असतो. २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या १७८ असताना २०२० मध्ये १०२ वर आली. वर्धा जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असलेली माता मृत्यूची संख्या २०२० मध्ये कमी होऊन १६ झाली. परंतु भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या ७ असताना २०२० मध्ये ती वाढून ११वर गेली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये ९ वरून २०२०मध्ये १३, गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये १४ असताना २०२० मध्ये १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असताना २०२० मध्ये माता मृत्यूची संख्या ३० झाली.

- मृत्यूचे ऑडिट व त्यावरील उपाययोजनांची गरज

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात माता मृत्यूच्या अनेक कारणांमध्ये अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब, अ‍ॅनिमिया हे मुख्य कारण असल्याचे विविध प्रकरणांतून सामोर आले आहे. अलीकडे शासनाने प्रसूती मातांसाठी ‘ट्रान्सपोर्ट’ची विशेष व्यवस्था केली असली तरी मातांकडूनच रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मातामृत्यूचे ‘ऑडिट’ होणे व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

-डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ

-दोन वर्षांतील मातामृत्यू

जिल्हा २०१९ २०२०

नागपूर १७८ १०२

भंडारा७ ११

गडचिरोली९ १३

गोंदिया १४ १५

चंद्रपूर १९ ३०

वर्धा २९ १६