शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना काळात माता मृत्यूच्या प्रमाणात ७३ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:51 IST

Nagpur News कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ७३ टक्क्याने कमी झाले.

ठळक मुद्दे चार जिल्ह्यात मृत्युसंख्येत वाढ पूर्व विदर्भात २०१९ मध्ये २५५ तर २०२०मध्ये १८७ मृत्यू

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना काळात सर्वच क्षेत्र प्रभावित झाली असताना दिलासा देणारी बातमी सामोर आली आहे. पूर्वविदर्भात २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये मातामृत्यूचे प्रमाण ७३ टक्क्याने कमी झाले. मागील वर्षी १८७, तर त्यापूर्वी २५५ मातामृत्यूची नोंद होती. मात्र, सहा जिल्ह्यांपैकी भंडारा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यांत मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात १९९०मध्ये एक लाखांमागे ५५६ माता मृत्युदर होता. नुकत्याच झालेल्या ‘सॅम्पल सर्व्हे रजिस्ट्रेशन सर्व्हे’नुसार (एसआरएस) मागील तीन वर्षांत राज्यात माता मृत्युदर ६८ वरून ६१ नंतर ५५ आणि आता ४६ असा नोंदविण्यात आला आहे. यात पहिल्या क्रमांकावर केरळ (४३), महाराष्ट्र (४६), तामिळनाडू (६०), तेलंगाणा (६३), तर आंध्र प्रदेश (७४) राज्यांचा समावेश आहे. अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्च रक्तदाब, अ‍ॅनिमिया ही मातामृत्यूची मुख्य कारणे आहेत. यात ३८ टक्के मृत्यू प्रसूतीनंतर होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे (पोस्टमार्टम हेमरेज) होतात. हे मृत्यू थांबविण्यास आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागपूर व वर्धा जिल्हा वगळता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील माता मृत्यूचे ‘ऑडिट’ होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

- नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १०२ मृत्यू

नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल व डागा रुग्णलयात केवळ विदर्भच नाही तर शेजारच्या राज्यातील माता प्रसूतीसाठी येतात. यामुळे जिल्ह्यात माता मृत्यूचा दर इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असतो. २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या १७८ असताना २०२० मध्ये १०२ वर आली. वर्धा जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असलेली माता मृत्यूची संख्या २०२० मध्ये कमी होऊन १६ झाली. परंतु भंडारा जिल्ह्यात २०१९ मध्ये माता मृत्यूची संख्या ७ असताना २०२० मध्ये ती वाढून ११वर गेली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात २०१९ मध्ये ९ वरून २०२०मध्ये १३, गोंदिया जिल्ह्यात २०१९ मध्ये १४ असताना २०२० मध्ये १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये २९ असताना २०२० मध्ये माता मृत्यूची संख्या ३० झाली.

- मृत्यूचे ऑडिट व त्यावरील उपाययोजनांची गरज

गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात माता मृत्यूच्या अनेक कारणांमध्ये अतिरक्तस्राव, जंतुसंसर्ग, उच्चरक्तदाब, अ‍ॅनिमिया हे मुख्य कारण असल्याचे विविध प्रकरणांतून सामोर आले आहे. अलीकडे शासनाने प्रसूती मातांसाठी ‘ट्रान्सपोर्ट’ची विशेष व्यवस्था केली असली तरी मातांकडूनच रुग्णालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मातामृत्यूचे ‘ऑडिट’ होणे व त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

-डॉ. चैतन्य शेंबेकर, स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ

-दोन वर्षांतील मातामृत्यू

जिल्हा २०१९ २०२०

नागपूर १७८ १०२

भंडारा ७ ११

गडचिरोली ९ १३

गोंदिया १४ १५

चंद्रपूर १९ ३०

वर्धा २९ १६

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस