शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

लागले मास्क विक्रीचे दर फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST

- लोकमतचा प्रभाव नागपूर : शासनाने राज्यात एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयापर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ...

- लोकमतचा प्रभाव

नागपूर : शासनाने राज्यात एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयापर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. शिवाय, उपलब्ध मास्कचा फलक किमतीनुसार औषध दुकानाच्या बाहेर लावण्याचे निर्देशही दिले. परंतु लोकमत चमूने याबाबतची ‘रिॲलिटी चेक’केली असता ‘एन ९५’ मास्क कुठे १०० तर कुठे १५० रुपयात मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणले. याची दखल घेत औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली. परिणामी, शहरातील काही दुकानांमध्ये मास्कच्या किमतीचे फलक दिसून येऊ लागले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध म्हणून मास्क महत्त्वाचा घटक आहे. दरम्यानच्या काळात मास्कच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढल्या. याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडला. याच्या तक्रारी झाल्या. अखेर शासनाने मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली. समितीने उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही ‘कॉस्ट ऑडिटर’ यांच्या सहाय्याने निर्धारित केली. मास्कच्या निर्धारित दराबाबत अध्यादेशही काढले. परंतु काही औषध विक्रेते जादा पैशाच्या हव्यासापोटी अध्यादेशालाच काळे फासत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने ‘४९ रुपयाचा मास्क १५० रुपयात’या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल औषध प्रशासनाने घेऊन कारवाईला सुरुवात केली. परिणामी, काही औषध दुकानांमध्ये मास्कचे दरफलक लागले. परंतु काही दुकानांनी कारवाईच्या भीतीने मास्कची विक्रीच करणे बंद केले आहे.