शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 21:00 IST

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देधोका पूर्णपणे टळलेला नाही 

 

नागपूर : राज्यात नागपूरसह काही अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात कारवाईला विरोध होत असल्याने मास्क न घालणाऱ्यांवरील कारवाई थंडावली आहे.

मागील काही महिन्यांत रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नाही. याचा विचार करता खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. परंतु प्रशासनाच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

मार्चपर्यंत कोरोना संक्रमण अधिक असताना विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात होती. परंतु, रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होताच मास्क न वापरणाऱ्यांवरील कारवाई कमी झाली आहे.

विनामास्क कारवाई थंडावली

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विनामास्क लोकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, बाजारात वा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कारवाईला होणारा विरोध विचारात घेता पथकाला सक्ती करता येत नाही. यामुळे कारवाई कमी झाली आहे.

नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला

सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारात गर्दी वाढली आहे. सोबतच विनामास्क लोकांची संख्या वाढली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकजण मास्क लावतात. पण तोंडावर नसतो. काही जण खिशात मास्क ठेवतात. वास्तविक पथकाचा हेतू हा दंड वसुलीचा नाही. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई केली जाते. परंतु बेजबाबदारपणा वाढला आहे. यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे त्यांच्याच हिताचे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस