शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 21:00 IST

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देधोका पूर्णपणे टळलेला नाही 

 

नागपूर : राज्यात नागपूरसह काही अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परंतु रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात कारवाईला विरोध होत असल्याने मास्क न घालणाऱ्यांवरील कारवाई थंडावली आहे.

मागील काही महिन्यांत रुग्णांची संख्या कमी झाल्याने महापालिका प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु, तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नाही. याचा विचार करता खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. परंतु प्रशासनाच्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

मार्चपर्यंत कोरोना संक्रमण अधिक असताना विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात होती. परंतु, रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात होताच मास्क न वापरणाऱ्यांवरील कारवाई कमी झाली आहे.

विनामास्क कारवाई थंडावली

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विनामास्क लोकांवर कारवाई सुरू आहे. मात्र, बाजारात वा सार्वजनिक ठिकाणी विनामास्क लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कारवाईला होणारा विरोध विचारात घेता पथकाला सक्ती करता येत नाही. यामुळे कारवाई कमी झाली आहे.

नागरिकांचा बेजबाबदारपणा वाढला

सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारात गर्दी वाढली आहे. सोबतच विनामास्क लोकांची संख्या वाढली आहे. कारवाई टाळण्यासाठी अनेकजण मास्क लावतात. पण तोंडावर नसतो. काही जण खिशात मास्क ठेवतात. वास्तविक पथकाचा हेतू हा दंड वसुलीचा नाही. तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई केली जाते. परंतु बेजबाबदारपणा वाढला आहे. यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे त्यांच्याच हिताचे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस