शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाच गरीब जोडप्यांचा विवाह करून साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 10:58 IST

नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच अत्यंत गरीब जोडप्यांचा विवाह साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देअग्रवाल दाम्पत्याने समाजापुढे ठेवला नवा आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच अत्यंत गरीब जोडप्यांचा विवाह साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात नागपूरच्या हिवरी ले-आऊटमधील माहेश्वरी भवनात मंगळवारी पार पडला.स्वत:चा वाढदिवस असो वा लग्नाचा तो धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा सुरु आहे. यासाठी हजारो रुपयेसुद्धा खर्च केले जातात. नागपूर येथील सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल या दाम्पत्याने आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस गरीब पाच जोडप्यांचा विवाह लावून साजरा करण्याचा ठरविले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याची निवड करुन पाच गरीब जोडप्यांची निवड करण्याची जबाबदारी किरण वडेट्टीवार, ब्रह्मपुरीच्या नगराध्यक्ष रिता उराडे, संध्या जैन यांच्यावर सोपविण्यात आली. ती त्यांनी पार पाडली. या पाचही जोडप्यांचा विवाह सुनील अग्रवाल व अर्चना अग्रवाल या दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजेच मंगळवारी लावून दिला. त्यांनी मुलीचे कन्यादान करुन पाचही जोडप्यांना संसारपयोगी सर्व वस्तूंसह सायकल, पंखे, शिलाई मशिन, कपाट भेट दिले. या विवाह सोहळ्याला आमदार विजय वडेट्टीवार व किरण वडेट्टीवार यांच्यासह ब्रह्मपुरी नगराध्यक्ष रिता उराडे, नगरसेविका, वनिता अलगदेवे सुनीता तिडके व लता ठाकूर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. लग्नाचा वाढदिवस गरीब कुटुंबातील लोकांचे लग्न लावून साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने हा सोहळा चर्चेचा विषय ठरला होता.

टॅग्स :marriageलग्न