शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:29 IST

अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येणार, आयुक्तांनी निर्णय घ्यावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे अधक्ष अजय मदान म्हणाले, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिशेनुसार अवलंबला. पण त्यानंतरही बाजारात गर्दी होत असून त्यावर नियंत्रण नाही. ग्राहकांना पूर्णवेळ आणि आवडीनुसार खरेदी करू देण्यासाठी प्रत्येक बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवाव्यात. त्यामुळे ग्राहक एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यास त्याला आवडीनुसार मनसोक्त खरेदी करता येईल. ऑड-इव्हन फॉर्म्युल्यात ग्राहकाच्या आवडीचे दुकान बंद असेल तर तो अन्य दुकानातून खरेदी करून मोकळा होतो. त्यामुळे संबंधित दुकानदाराला आार्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे अनेकांना व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे.गांधीबाग होलसेल क्लॉथ बाजारात विदर्भातील अन्य जिल्हे आणि तालुक्यातील किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनाही दिवस निवडून आणि पासेस बनवून खरेदीसाठी नागपुरात यावे लागते. तसे पाहता अन्य जिल्हे आणि तालुकास्तरावर बाजारपेठा दरदिवशी खुल्या आहेत. पण ग्राहकांच्या आवडीनिवडी जपणे त्यांना होलसेलमध्ये खरेदीअभावी कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून मनपा आयुक्तांनी बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे मदान म्हणाले.बाजारपेठा अडीच महिने बंद होत्या. त्यामुळे व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. बाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी यावे म्हणून दुकानदारांकडे असलेल्या डेटाचा वापर मेसेजच्या स्वरूपात करीत आहे. सध्या ग्राहक कमी असले तरीही पुढे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघतील, असा विश्वास मदान यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर