शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

बाजारपेठा एक दिवसाआड खुल्या ठेवाव्यात : व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:29 IST

अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येणार, आयुक्तांनी निर्णय घ्यावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनलॉक-१ मध्ये ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत आहेत. पण आॅड-इव्हन फॉर्म्युल्यामुळे त्यांना खरेदीला त्रास होत आहे. ग्राहकांच्या संख्यावाढीसाठी दुकानदारांतर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून संग्रहित डेटातून मॅसेज पाठविले जात आहेत. नागपुरातील बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवण्यास ग्राहकांना खरेदीची सोय होणार आहे. मनपा आयुक्तांनी दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केली.गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटचे अधक्ष अजय मदान म्हणाले, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्तांनी ऑड-इव्हन फॉर्म्युला दिशेनुसार अवलंबला. पण त्यानंतरही बाजारात गर्दी होत असून त्यावर नियंत्रण नाही. ग्राहकांना पूर्णवेळ आणि आवडीनुसार खरेदी करू देण्यासाठी प्रत्येक बाजारपेठा एक दिवसाआड सुरू ठेवाव्यात. त्यामुळे ग्राहक एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यास त्याला आवडीनुसार मनसोक्त खरेदी करता येईल. ऑड-इव्हन फॉर्म्युल्यात ग्राहकाच्या आवडीचे दुकान बंद असेल तर तो अन्य दुकानातून खरेदी करून मोकळा होतो. त्यामुळे संबंधित दुकानदाराला आार्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे अनेकांना व्यवसायावर पाणी सोडावे लागत आहे.गांधीबाग होलसेल क्लॉथ बाजारात विदर्भातील अन्य जिल्हे आणि तालुक्यातील किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनाही दिवस निवडून आणि पासेस बनवून खरेदीसाठी नागपुरात यावे लागते. तसे पाहता अन्य जिल्हे आणि तालुकास्तरावर बाजारपेठा दरदिवशी खुल्या आहेत. पण ग्राहकांच्या आवडीनिवडी जपणे त्यांना होलसेलमध्ये खरेदीअभावी कठीण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून मनपा आयुक्तांनी बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे मदान म्हणाले.बाजारपेठा अडीच महिने बंद होत्या. त्यामुळे व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. बाजार सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी खरेदीसाठी यावे म्हणून दुकानदारांकडे असलेल्या डेटाचा वापर मेसेजच्या स्वरूपात करीत आहे. सध्या ग्राहक कमी असले तरीही पुढे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघतील, असा विश्वास मदान यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर