शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: November 9, 2015 05:39 IST

शेतकरी हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुख्य घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर अडतियांचे उत्पन्न वाढेल.

नागपूर : शेतकरी हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुख्य घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर अडतियांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च कमी करू न त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर व इफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित ‘एनसीडीईएक्स सेंटर उभारणीकरिता सेमिनार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील चिटणीस सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आमदार सुनील केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, इफ्कोचे सतीश गाडगे व एनसीडीईएक्सचे रवींद्र शेवडे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले,‘कम्युनिटी एक्सजेंच’मध्ये केवळ कागदावर व्यवहार चालतो. अनेकांच्या मते, महागाई वाढण्याचे ते एक कारण ठरत आहे. त्यामुळे याचा अभ्यास झाला पाहिजे. शिवाय विदर्भातील शेतकऱ्यांच्या पीक पद्घतीत बदल करू न, त्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न झाले पाहिजे. मात्र सध्या त्याच्या उलट स्थिती आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना कमी किमतीत बी-बियाणे व खते कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. सध्या सोयाबीनचे एकरी उत्पादन फारच कमी झाले आहे. त्यामुळे तेलबिया व डाळबियांचे उत्पादन वाढविणे एक आव्हान ठरले आहे. दुसरीकडे शेतकरी जो माल उत्पादित करतो, त्याचे योग्य मार्केटिंग होत नाही. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यादिशेनेही बाजार समित्यांनी विचार केला पाहिजे. या कृषी उत्पादन क्षेत्रात ‘इनोव्हेशन व टेक्नॉलॉजी’च्या उपयोगासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा. सरकार खताच्या किमती २०० ते ३०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर अहमद शेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)