शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:24 IST

Diwali Flowers Nagpur News नागपूरच्या बाजारात झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते.

ठळक मुद्देपूजा व सजावटीच्या फुलांची आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या फूलांना जास्त मागणी असते. दसऱ्याला आणि दिवाळीत तीन दिवस फुलांची जास्त विक्री होते. त्यानुसार सीताबर्डी, नेताजी मार्केटमधील ठोक बाजारात नागपूर जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागातून पूजेची आणि सजावटीच्या फूलांची आवक वाढली आहे. गुरुवारी झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाववाढीची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

नेताजी मार्केट ठोक फूल बाजाराचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, फुलांची सर्वाधिक विक्री दिवाळीच्या तीन दिवसात होते. गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना फुलाचे चांगले पीक झाले आहे. कोरोनानंतर दसरा आणि दिवाळीत फुलांना मागणी असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत. बुधवारी २० गाड्यांची आवक झाली, तर गुरुवारी आवक दुपटीपेक्षा जास्त होती. सकाळी झेंडूचे भाव १०० रुपये होते, नंतर १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले. याशिवाय शेवंती २५० रुपये तर नंतर ३०० रुपये किलोवर भाव गेले. झेंडूमध्ये लोकल, कोलकाता, नवरंग माल येत आहे. याशिवाय देशी गुलाब आणि डिवाईन गुलाबाचे भाव ३०० ते ४०० रुपये किलो होते. थंडीमुळे निशिगंधा फुलांची आवक कमी असल्याने भाव ५०० रुपये किलो होते. याशिवाय कुंदा फुलांच्या माळा (जास्मीन प्रकार, सोबत गुलाब) किलोनुसार ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव आहेत. तसे पाहता दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांची मागणी कमी असते. केवळ घर सजावट आणि पूजेसाठी फुले लागतात. व्यापारी पंचमीला पूजा करीत असल्याने त्या दिवशी मागणी वाढते. सर्व फ्रेश माल येत आहे.

फुलांची आवक नागपूर जिल्ह्याच्या ७० ते ८० किमी परिसरातून होत आहे. याशिवाय बेंगळुरू, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथून १२ ते १५ गाड्यांची (एक गाडी ३ ते ४ टन) आवक आहे. या तुलनेत स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात येत आहे. दिवाळीच्या दिवसात चोहोबाजूने फुलांची आवक होत असल्याचे रणनवरे यांनी सांगितले. बाजारात आवक वाढल्याने आणि भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळ शेतकरी आनंदी आहेत. कोरोना काळात झालेली नुकसान भरपाई दिवाळीत थोडीफार भरून निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

बाजारात ग्राहकांची गर्दी

फूल बाजारात किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यानुसार दुकानदारही कोरोना नियमांचे पालन करीत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. पण किरकोळ विक्रेते आणि ग्राहक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. दुकानदार सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. दिवाळीच्या दिवसात मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाजाराचा फेरफटका मारून पाहणी करावी, त्यामुळे ग्राहकांवर नियंत्रण येईल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी