शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 11:24 IST

Diwali Flowers Nagpur News नागपूरच्या बाजारात झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते.

ठळक मुद्देपूजा व सजावटीच्या फुलांची आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : दसरा ते दिवाळीपर्यंत पूजेच्या फूलांना जास्त मागणी असते. दसऱ्याला आणि दिवाळीत तीन दिवस फुलांची जास्त विक्री होते. त्यानुसार सीताबर्डी, नेताजी मार्केटमधील ठोक बाजारात नागपूर जिल्हा आणि राज्याच्या अन्य भागातून पूजेची आणि सजावटीच्या फूलांची आवक वाढली आहे. गुरुवारी झेंडू, शेवंती आणि देशी गुलाबाची जवळपास ५० गाड्यांची (एक गाडी दीड टन) आवक झाली असून सकाळी झेंडू १०० ते १५० रुपये आणि शेवंती फुलाचे भाव २५० ते ३०० रुपये किलो होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाववाढीची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

नेताजी मार्केट ठोक फूल बाजाराचे अध्यक्ष जयंत रणनवरे म्हणाले, फुलांची सर्वाधिक विक्री दिवाळीच्या तीन दिवसात होते. गेल्या महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना फुलाचे चांगले पीक झाले आहे. कोरोनानंतर दसरा आणि दिवाळीत फुलांना मागणी असल्याने उत्पादक शेतकरी उत्साही आहेत. बुधवारी २० गाड्यांची आवक झाली, तर गुरुवारी आवक दुपटीपेक्षा जास्त होती. सकाळी झेंडूचे भाव १०० रुपये होते, नंतर १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले. याशिवाय शेवंती २५० रुपये तर नंतर ३०० रुपये किलोवर भाव गेले. झेंडूमध्ये लोकल, कोलकाता, नवरंग माल येत आहे. याशिवाय देशी गुलाब आणि डिवाईन गुलाबाचे भाव ३०० ते ४०० रुपये किलो होते. थंडीमुळे निशिगंधा फुलांची आवक कमी असल्याने भाव ५०० रुपये किलो होते. याशिवाय कुंदा फुलांच्या माळा (जास्मीन प्रकार, सोबत गुलाब) किलोनुसार ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव आहेत. तसे पाहता दसऱ्यापेक्षा दिवाळीत फुलांची मागणी कमी असते. केवळ घर सजावट आणि पूजेसाठी फुले लागतात. व्यापारी पंचमीला पूजा करीत असल्याने त्या दिवशी मागणी वाढते. सर्व फ्रेश माल येत आहे.

फुलांची आवक नागपूर जिल्ह्याच्या ७० ते ८० किमी परिसरातून होत आहे. याशिवाय बेंगळुरू, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथून १२ ते १५ गाड्यांची (एक गाडी ३ ते ४ टन) आवक आहे. या तुलनेत स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणात येत आहे. दिवाळीच्या दिवसात चोहोबाजूने फुलांची आवक होत असल्याचे रणनवरे यांनी सांगितले. बाजारात आवक वाढल्याने आणि भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळ शेतकरी आनंदी आहेत. कोरोना काळात झालेली नुकसान भरपाई दिवाळीत थोडीफार भरून निघेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

बाजारात ग्राहकांची गर्दी

फूल बाजारात किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यानुसार दुकानदारही कोरोना नियमांचे पालन करीत मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. पण किरकोळ विक्रेते आणि ग्राहक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. दुकानदार सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. दिवाळीच्या दिवसात मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बाजाराचा फेरफटका मारून पाहणी करावी, त्यामुळे ग्राहकांवर नियंत्रण येईल, असे रणनवरे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी