शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्तरावर मराठीची गगनभरारी आवश्यक ! महिला साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By गणेश हुड | Updated: April 26, 2025 17:27 IST

डॉ. प्रज्ञा आपटे : ‘आम्ही सिद्ध लेखिका’च्या तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली आणि यादव व शिवशाही काळात राजभाषेचा दर्जा लाभलेली मराठी भाषा आता अभिजात भाषेच्या गौरवाने सन्मानित झाली आहे. मराठीने आता जागतिक स्तरावर पोहचले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी अमृत भवन येथे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका व कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग, विश्वस्त व स्वागताध्यक्षा उषा चांदूरकर, विदर्भ प्रमुख कविता कठाणे, ॲड. प्रार्थना सदावर्ते, अस्मिता चौधरी, पद्मा हुशिंग, वृषाली राजे, ज्योत्स्ना चांदगुडे, शुभांगी गान, देविका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रज्ञा आपटे म्हणाल्या, साहित्याच्या माध्यमातून आजची तरुण पिढी समाजातील विविध व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडत आहे. साहित्याचा प्राणतत्त्व म्हणजे मनुष्यता आहे. शुभांगी भडभडे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा दर्जा मराठीच्या सांस्कृतिक वारशाला आणि कलासंपन्नतेला मिळालेली मान्यता आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग म्हणाल्या, ‘लिहा आणि लिहिते व्हा’ हे आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य असून, विविध उपक्रमांद्वारे महिला साहित्यिक घडवण्यात आले आहेत. पुढील उद्दिष्ट अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचे आहे. संमेलनाच्या निमित्ताने कविता कठाणे यांच्या ‘विदर्भ गौरव’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात त्यांनी संमेलन विदर्भात घेण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रार्थना सदावर्ते यांनी स्वागतपर प्रस्ताविक केले, तर सूत्रसंचालन अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर आणि विना डोंगरवार यांनी केले.

याप्रसंगी अश्विनी चौधरी, गायत्री हेर्लेकर, शीला गहलोत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. परिसंवाद सत्रात डॉ. शोभा रोकडे, वसुधा वैद्य, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. वृंदा कौजलगीकर यांचाही सहभाग होता. अखेरच्या सत्रात ‘काव्यसरिता’, ‘काव्यधारा’ आणि ‘काव्यसंध्या’ या कार्यक्रमांमधून विविध कवी-लेखिकांनी आपली प्रतिभा सादर केली.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर