शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

जागतिक स्तरावर मराठीची गगनभरारी आवश्यक ! महिला साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By गणेश हुड | Updated: April 26, 2025 17:27 IST

डॉ. प्रज्ञा आपटे : ‘आम्ही सिद्ध लेखिका’च्या तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली आणि यादव व शिवशाही काळात राजभाषेचा दर्जा लाभलेली मराठी भाषा आता अभिजात भाषेच्या गौरवाने सन्मानित झाली आहे. मराठीने आता जागतिक स्तरावर पोहचले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी अमृत भवन येथे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका व कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग, विश्वस्त व स्वागताध्यक्षा उषा चांदूरकर, विदर्भ प्रमुख कविता कठाणे, ॲड. प्रार्थना सदावर्ते, अस्मिता चौधरी, पद्मा हुशिंग, वृषाली राजे, ज्योत्स्ना चांदगुडे, शुभांगी गान, देविका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रज्ञा आपटे म्हणाल्या, साहित्याच्या माध्यमातून आजची तरुण पिढी समाजातील विविध व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडत आहे. साहित्याचा प्राणतत्त्व म्हणजे मनुष्यता आहे. शुभांगी भडभडे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा दर्जा मराठीच्या सांस्कृतिक वारशाला आणि कलासंपन्नतेला मिळालेली मान्यता आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग म्हणाल्या, ‘लिहा आणि लिहिते व्हा’ हे आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य असून, विविध उपक्रमांद्वारे महिला साहित्यिक घडवण्यात आले आहेत. पुढील उद्दिष्ट अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचे आहे. संमेलनाच्या निमित्ताने कविता कठाणे यांच्या ‘विदर्भ गौरव’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात त्यांनी संमेलन विदर्भात घेण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रार्थना सदावर्ते यांनी स्वागतपर प्रस्ताविक केले, तर सूत्रसंचालन अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर आणि विना डोंगरवार यांनी केले.

याप्रसंगी अश्विनी चौधरी, गायत्री हेर्लेकर, शीला गहलोत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. परिसंवाद सत्रात डॉ. शोभा रोकडे, वसुधा वैद्य, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. वृंदा कौजलगीकर यांचाही सहभाग होता. अखेरच्या सत्रात ‘काव्यसरिता’, ‘काव्यधारा’ आणि ‘काव्यसंध्या’ या कार्यक्रमांमधून विविध कवी-लेखिकांनी आपली प्रतिभा सादर केली.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर