शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता : श्रीनिवास ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:18 IST

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देइच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.डॉ. ठाणेदार हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या गव्हर्नरची निवडणूकही ते लढले आहेत. त्यांनी आपली आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. त्याची ५० वी आवृत्ती निघत आहे. ई वेबसाईटवर ती पाच लाख लोकांनी बघितली आहे, हे विशेष.डॉ. ठाणेदार म्हणाले, मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा मला आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. हा माझा अनुभव असून विद्यार्थ्यांशी सुद्धा मी हाच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते.भारताची गेल्या २० वर्षात खूप प्रगती१९८९ मध्ये मी भारत सोडला, तेव्हा भारतात फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. गेल्या २० वर्षात भारताने खूप प्रगती केली आहे. आता चांगल्या संधी आहेत. जगातील इतर हुकूमशाही देश पाहिल्यावर आपल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असल्याचा अनुभव येतो. मराठी माणसात स्कीलची कमतरता नाही थोडा आत्मविश्वास कमी असल्याचेही डॉ. ठाणेदार यांनी यावेळी सांगितले. दोन पुस्तके लिहिली असून अमेरिकेतील निवडणुकीच्या अनुभवावरही एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर