शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता : श्रीनिवास ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:18 IST

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देइच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.डॉ. ठाणेदार हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या गव्हर्नरची निवडणूकही ते लढले आहेत. त्यांनी आपली आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. त्याची ५० वी आवृत्ती निघत आहे. ई वेबसाईटवर ती पाच लाख लोकांनी बघितली आहे, हे विशेष.डॉ. ठाणेदार म्हणाले, मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा मला आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. हा माझा अनुभव असून विद्यार्थ्यांशी सुद्धा मी हाच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते.भारताची गेल्या २० वर्षात खूप प्रगती१९८९ मध्ये मी भारत सोडला, तेव्हा भारतात फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. गेल्या २० वर्षात भारताने खूप प्रगती केली आहे. आता चांगल्या संधी आहेत. जगातील इतर हुकूमशाही देश पाहिल्यावर आपल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असल्याचा अनुभव येतो. मराठी माणसात स्कीलची कमतरता नाही थोडा आत्मविश्वास कमी असल्याचेही डॉ. ठाणेदार यांनी यावेळी सांगितले. दोन पुस्तके लिहिली असून अमेरिकेतील निवडणुकीच्या अनुभवावरही एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर