शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? ...वाला? विचारल्यानंतर ' ठेवून घ्या' असे खेवलकर यांनी दिले होते होकारार्थी उत्तर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
4
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
5
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
6
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
7
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
8
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
9
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
10
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
11
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
12
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
13
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
14
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
15
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
16
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
17
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
18
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
20
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता : श्रीनिवास ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:18 IST

मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देइच्छाशक्तीच्या जोरावर काहीही साध्य करता येते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी माणसाकडे स्कील आहे, पण आत्मविश्वासाची कमतरता आहे. जीवनात प्रत्येकालाच अपयश येते, पण हार मानू नका, त्यातून मार्ग काढा. इच्छाशक्तीच्या जोरावर जगात काहीही साध्य करता येते, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि नागपुरात आयोजित १६ वे जागतिक मराठी संमेलन ‘शोध मराठी मनाचा’चे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी येथे स्पष्ट केले. प्रेस क्लब येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.डॉ. ठाणेदार हे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आहेत. अमेरिकेतील मिशिगन राज्याच्या गव्हर्नरची निवडणूकही ते लढले आहेत. त्यांनी आपली आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. त्याची ५० वी आवृत्ती निघत आहे. ई वेबसाईटवर ती पाच लाख लोकांनी बघितली आहे, हे विशेष.डॉ. ठाणेदार म्हणाले, मी एक मराठी माणूस. वडील कारकून होते. असे असताना मी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक आहे. ५०० लोकांना मी रोजगार देतो. मी खूप मोठे काम केले असे नाही. परंतु जीवनात जे काही मिळविले ते केवळ स्वत:च्या इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवले आहे. त्यामुळेच मी माझी आत्मकथा ‘ही श्री ची इच्छा’ लिहिली आहे. हा सर्व व्यवसाय सुखात सुरू होता. सर्व काही सेटल होते. अशावेळी अमेरिकेत जागतिक मंदी आली आणि क्षणात २०० मिलियन डॉलरचा उभा केलेला व्यवसाय बुडाला. परंतु मी हार मानली नाही. वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा व्यवसाय उभा केला. या अनुभवावर आधारित मी ‘पुन्हा श्री गणेशा’ हे दुसरे पुस्तक लिहिले. या दोन्ही पुस्तकांमध्ये माझ्या कर्तबगारीपेक्षा मला आलेल्या अपयशाचीच जास्त चर्चा आहे. त्यामुळे अपयश आले की खचू नका. हार मानू नका, त्याचा सामना करा, मार्ग नक्कीच निघेल. हा माझा अनुभव असून विद्यार्थ्यांशी सुद्धा मी हाच संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी, प्रदीप मैत्र प्रामुख्याने उपस्थित होते.भारताची गेल्या २० वर्षात खूप प्रगती१९८९ मध्ये मी भारत सोडला, तेव्हा भारतात फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. परंतु आता तशी परिस्थिती नाही. गेल्या २० वर्षात भारताने खूप प्रगती केली आहे. आता चांगल्या संधी आहेत. जगातील इतर हुकूमशाही देश पाहिल्यावर आपल्या भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी असल्याचा अनुभव येतो. मराठी माणसात स्कीलची कमतरता नाही थोडा आत्मविश्वास कमी असल्याचेही डॉ. ठाणेदार यांनी यावेळी सांगितले. दोन पुस्तके लिहिली असून अमेरिकेतील निवडणुकीच्या अनुभवावरही एक पुस्तक लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनnagpurनागपूर