शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्थेत अनेक दोष, नियंत्रणासाठी हवी स्वतंत्र संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:49 IST

न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’ सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रशांत भूषण यांचे मत : डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयातर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत अतिशय महत्त्वपूर्ण असलेला न्यायव्यवस्थेचा स्तंभ आज ढासळण्याच्या मार्गावर आहे. हे क्षेत्रही भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर आरोप होत असताना त्यांच्या चौकशीसाठी योग्य व्यवस्था नाही. प्रतिष्ठेच्या नावावर न्यायव्यवस्थेतील अनियमिततेकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकली जात आहे. दुसरीकडे न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्येही वशिलेबाजी व भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या विरोधातील गंभीर तक्रारींच्या चौकशीसाठी व नियुक्तीसाठी ‘न्यायिक लोकपाल’सारखी स्वतंत्र संस्था निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले.डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्यावतीने ‘न्यायिक जबाबदारी व न्यायव्यवस्थेतील सुधारणा’ विषयावर अ‍ॅड. प्रशांत भूषण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी. पवार, विधी विभागाचे प्रमुख एन.एम. खिराळे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी न्यायव्यवस्थेतील अनियमिततेवर यावेळी तीव्र प्रहार केला. त्यांनी अकाऊंटीबिलिटी (जबाबदारी)च्या प्रश्नापासून सुरुवात केली. न्यायव्यवस्था इतर विभागातील अनियमिततेबाबत बोलते, मात्र त्यांच्या स्वत:च्या व्यवस्थेत असलेली अनियमितता झाकून ठेवली जाते. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप व इतर अनेक स्वरुपाच्या गंभीर तक्रारी दाखल झाल्या. मात्र आजपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. कारवाईसाठी असलेल्या महाभियोगाच्या पद्धतीचा गैरवापरच केला जातो. असे प्रकरण संसदेत जाते व सरकारच्या प्रतिनिधींकडून त्याचा फायदा घेतला जातो. त्यानंतर सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या सीबीआयसारख्या तपास यंत्रणांकडून थातूरमातूर चौकशी करून प्रकरण ‘रफादफा’ केले जाते. न्यायव्यवस्थेत तपासाची ‘इन हाऊस’ व्यवस्था आहे. मात्र ओळखीमुळे दोषी न्यायाधीशाचा तपास योग्य पद्धतीने होत नाही. कधी ओळख नसली तरी, व्यवस्थेची प्रतिष्ठा म्हणूनही अशा प्रकरणांवर पडदा टाकला जातो. माहिती अधिकार कायदाही न्यायपालिकेची जबाबदारी निश्चित करण्यात निष्प्रभ ठरला आहे. अशावेळी न्यायाधीशांविरोधातील तक्रारींच्या पारदर्शक चौकशीसाठी न्यायिक लोकपालसारखी स्वतंत्र संस्था निर्माण करणे आवश्यक आहे. निष्क्रिय न्यायव्यवस्था फायद्याची ठरत असल्याने सरकार त्यामध्ये सुधारणा करण्यास तयार नाही. दुसरीकडे सरकारकडून लाभ घेण्यासाठी न्यायाधीशांनाही सुधारणेत रस नाही. त्यामुळे न्यायव्यवस्था वाचविण्यासाठी देशातील तरुण व नागरिकांना याबाबत चर्चा घडवून आंदोलन उभे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.संचालन व आभारप्रदर्शन डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले.नियुक्तीसाठी असावी युपीएससीसारखी प्रक्रियाउच्च व सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवरही त्यांनी यावेळी प्रहार केला. या नियुक्त्या नातलगांची वशिलेबाजी व भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या आहेत. कॉलेजियम पद्धतीमध्ये निवड करणारे न्यायाधीश नातेवाईकांना व ओळखीच्यांना प्राधान्य देतात. सरकारही मग आपल्या लोकांना संधी देण्यासाठी दबाव निर्माण करतात. यामुळे न्यायव्यवस्थेची स्वतंत्रता नष्ट होते. दुसरीकडे कॉलेजियममधील न्यायाधीशांना निवड करण्यासाठी पुरेसा वेळही नसल्याने योग्य निवड होईलच असे नाही. त्यामुळे निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या कामासाठी पूर्ण वेळ देणारी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. याशिवाय युपीएससीप्रमाणे कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी यंत्रणा तयार करावी असे मतही अ‍ॅड. भूषण यांनी व्यक्त केले.ग्रामन्यायालयाचे काय झाले?देशात उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची प्रचंड कमतरता आहे. दोन्हीकडे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही बाब गंभीरतेने घेतली जात नाही. न्यायपालिकेत सुधारणा म्हणून ग्रामन्यायालय कायदा करण्याचा प्रस्ताव आला. यामध्ये काही गावे मिळून ब्लॉक स्तरावर न्यायालयाची निर्मिती करून लहानसहान खटले निपटवण्याचा विचार होता. मात्र याची हवी तशी अंमलबजावणी झाली नाही. सरकार आणि न्यायपालिकाही सुधारणेबाबत गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Law Collegeडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी