शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

By यदू जोशी | Updated: July 12, 2018 06:06 IST

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.

 मुंबई : मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. हे कंत्राट दोन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष झाले होते की नाही, हे आज तपासणे शक्य नाही. मात्र, विभागाने उपलब्ध करून दिलेल्या फोटोंवरून अशा गोळ्या टाकल्या असल्याचे दिसते असा अफलातून निष्कर्ष काढण्यात आला आहे.या विषारी गोळ्या सहा महिन्यांत टाकायच्या असे निविदेत नमूद होते. मात्र हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यास कंत्राटदारास सांगण्यात आले आणि कंत्राटदार विनायक मजूर सहकारी संस्थेने हे काम सात दिवसांतच केले, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. हे सात दिवस नेमके कोणते होते याबाबत विसंगती आढळून येते, असेही दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या (नवी मुंबई) अधीक्षक अभियंत्यांच्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयातील उंदीरमार प्रकरण गाजले होते. त्याच्या चौकशीच्या अहवालाची प्रतच ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या, पण किती उंदीर मेले याची माहिती अहवालात देण्यात आलेली नाही.मंंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. ही बाब दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे मंत्रालयात खरेच ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या टाकल्या होत्या की नाही हे पाहणे आता शक्य नाही. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फोटोंवरून काम झाल्याचे दिसून येते, असा तर्क देत चौकशी अहवालात अधिकारी व कंत्राटदारांचा बचाव केल्याचे दिसून येते.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर हे विषारी गोळ्या टाकून मारल्याचे सांगत इतके उंदीर मेलेले कुणी पाहिले, एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी गोळ्या मंत्रालयात आणताना गृह व सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली होती का, असे सवाल केले होते़ लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. भाजपा आमदार चरणदास वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीचा आधार खडसे यांनी घेतला होता.विषारी गोळ्या टाकल्या तरी कधी?चौकशी अहवालात असे म्हटले आहे की, मोजमाप पुस्तक बघितले तर विषारी गोळ्या टाकल्याचे काम १३ मे २०१६ रोजी संपले असे नमूद आहे. मात्र दुसºया ठिकाणी हे काम४ आॅक्टोबर २०१६ रोजी संपल्याचे म्हटले आहे. दुसºया व अंतिम देयकावर काम पूर्ण केल्याची तारीख २४ मार्च २०१७ ही आहे.फोटोवरून काढला अजब निष्कर्षउंदीर मारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिलेली रक्कम आणि मंत्रालयात गोळ्या ठेवतानाचे चौकशी यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेले फोटो यावरून ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे दिसून येते असा अजब निष्कर्ष अधीक्षक अभियंत्यांनी काढला आहे. गोळ्या टाकतानाचे फोटो अहवालात जोडले आहेत पण त्यावरून ३ लाख १९ हजार ४०० इतक्याच गोळ्या टाकल्याचे कसे सिद्ध होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयCorruptionभ्रष्टाचार