शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयातील उंदीर प्रकरण : अहवाल पोखरला तरी उंदीर सापडेना!

By यदू जोशी | Updated: July 12, 2018 06:06 IST

मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे.

 मुंबई : मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी केवळ सात दिवसांत तब्बल ३ लाख १९ हजार ४०० विषारी गोळ्या टाकण्यात आल्या होत्या असा धक्कादायक निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशी अहवालात काढण्यात आला आहे. हे कंत्राट दोन वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष झाले होते की नाही, हे आज तपासणे शक्य नाही. मात्र, विभागाने उपलब्ध करून दिलेल्या फोटोंवरून अशा गोळ्या टाकल्या असल्याचे दिसते असा अफलातून निष्कर्ष काढण्यात आला आहे.या विषारी गोळ्या सहा महिन्यांत टाकायच्या असे निविदेत नमूद होते. मात्र हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यास कंत्राटदारास सांगण्यात आले आणि कंत्राटदार विनायक मजूर सहकारी संस्थेने हे काम सात दिवसांतच केले, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. हे सात दिवस नेमके कोणते होते याबाबत विसंगती आढळून येते, असेही दक्षता व गुण नियंत्रण मंडळाच्या (नवी मुंबई) अधीक्षक अभियंत्यांच्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयातील उंदीरमार प्रकरण गाजले होते. त्याच्या चौकशीच्या अहवालाची प्रतच ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी टाकण्यात आल्या होत्या, पण किती उंदीर मेले याची माहिती अहवालात देण्यात आलेली नाही.मंंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. ही बाब दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे मंत्रालयात खरेच ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या टाकल्या होत्या की नाही हे पाहणे आता शक्य नाही. मात्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फोटोंवरून काम झाल्याचे दिसून येते, असा तर्क देत चौकशी अहवालात अधिकारी व कंत्राटदारांचा बचाव केल्याचे दिसून येते.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर हे विषारी गोळ्या टाकून मारल्याचे सांगत इतके उंदीर मेलेले कुणी पाहिले, एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी गोळ्या मंत्रालयात आणताना गृह व सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेतली होती का, असे सवाल केले होते़ लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. भाजपा आमदार चरणदास वाघमारे यांनी माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीचा आधार खडसे यांनी घेतला होता.विषारी गोळ्या टाकल्या तरी कधी?चौकशी अहवालात असे म्हटले आहे की, मोजमाप पुस्तक बघितले तर विषारी गोळ्या टाकल्याचे काम १३ मे २०१६ रोजी संपले असे नमूद आहे. मात्र दुसºया ठिकाणी हे काम४ आॅक्टोबर २०१६ रोजी संपल्याचे म्हटले आहे. दुसºया व अंतिम देयकावर काम पूर्ण केल्याची तारीख २४ मार्च २०१७ ही आहे.फोटोवरून काढला अजब निष्कर्षउंदीर मारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिलेली रक्कम आणि मंत्रालयात गोळ्या ठेवतानाचे चौकशी यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेले फोटो यावरून ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे दिसून येते असा अजब निष्कर्ष अधीक्षक अभियंत्यांनी काढला आहे. गोळ्या टाकतानाचे फोटो अहवालात जोडले आहेत पण त्यावरून ३ लाख १९ हजार ४०० इतक्याच गोळ्या टाकल्याचे कसे सिद्ध होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयCorruptionभ्रष्टाचार