शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आंब्याचे भाव घसरल्याने खवय्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:54 IST

कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देबैगनफल्ली ६० रुपये किलो

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कळमना ठोक बाजारात आंब्याची आवक वाढल्याने किरकोळमध्ये दर घसरले असून सर्वाधिक विकणारे बैगनफल्ली आंबे ६० रुपये किलो आहेत. दर घसरल्याने खवय्यांना दिलासा मिळाला आहे.आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवकीचे बैगनफल्ली आंब्याचे भाव किरकोळमध्ये मे महिन्याच्या प्रारंभी १०० ते १२० रुपये होते. आवक वाढताच भाव ८० रुपये तर आता ६० रुपये किलोपर्यंत खाली आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबाने फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. घरपोच सेवा सुरू केली आहे. शिवाय शहरात सर्वत्र रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारून आंब्याची विक्री वाढली आहे. आंध्र प्रदेशचा हापूस १०० रुपये, केशर ८० रुपये किलो भाव आहेत. यावर्षी नागपूर जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन केवळ ५ ते १० टक्के आले आहे. गावरानी आंब्याची थोडीफार आवक सुरू आहे. यंदा रोगराईमुळे सिझनमध्ये पूर्वी चांगल्या दर्जाच्या आंब्याची आवक कमीच होती. पण आता सर्व ठिकाणांहून आवक वाढल्याने दरही घसरले आहेत. यावर्षी लॉकडाऊनमुळे कोकणातील हापूस आंबा नागपूरकांना चाखायला मिळाला नाही. थोडीफार आवक झाली, पण ५०० ते ७०० रुपये डझन भाव असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविली. गरीब व सामान्यांच्या आवाक्यातील बैगनफल्ली आंब्यालाच जास्त मागणी आहे. जूनमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर आंब्याची आवक आणि विक्री कमी होणार आहे. त्यामुळे सिझनच्या अखेरीस नागरिकांनी आंब्याची खरेदी करावी, असे आवाहन विक्रेत्यांनी केले आहे.

टॅग्स :Mangoआंबाnagpurनागपूर