शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव

By गणेश हुड | Updated: May 15, 2024 15:15 IST

Nagpur : नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ मे दरम्यान करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नागपूर येथील विभागीय कार्यालयातर्फे पहिल्यादांच नागपुरात आंबा, मिलेट व धान्य अशा एकत्रित महोत्सवाचे आयोजन १६ ते १९ मे दरम्यान करण्यात आले आहे. शहरातील उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन येथे आयोजित या महोत्सवाचे कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संचालक अजय कडू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.  

संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. या अनुषंगाने महराष्ट्र श्री अन्न अभियान सुरु करण्यात आले आहे. तृणधान्यांचे  पोषण आहारात  असलेले  महत्व विचारात घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या आहारातील तृणधान्याचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत तृणधान्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारे मोठ्या प्रमाणात नवउद्योजक तयार झाले आहेत. यामध्ये वैयक्तिक उत्पादक, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या यांचा समावेश आहे. सदर उत्पादकांच्या उत्पादनांचा प्रचार, ग्राहकांमध्ये जागरुकता, थेट खरेदी व मार्केट लिकेनेस तयार करणे आवश्यक आहे. या हेतुने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ज्वारी, नाचणी, बाजरी, सावा, वरई, आमा, भगर, राळा यासह उत्पादीत माल उपलब्ध राहणार असल्याची माहिती अजय कडू यांनी दिली. यावेळी  नागपूर विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक राजेश सरोते उपस्थित होते.

महोत्सवात एक कोटींचा आंबा महोत्सवामध्ये  एक कोटी रुपयांचा आंबा येण्याची अपेक्षा आहे. यात  रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील हापूस तसेच राज्यातील इतर भागातील केशर आंबा उत्पादकांचा सामावेश असणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या सर्व भागातून मिलेट व धान्य उत्पादक त्याच्या शेतमालाची कोणत्याही मध्यस्थाविना थेट ग्राहकांना विक्री करणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMangoआंबा