शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

परिषदेत मंगलप्रभात लोढांनी खिशातून राजीनामाच बाहेर काढला; विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या आरोपींमुळे व्यथित 

By योगेश पांडे | Updated: December 20, 2023 18:27 IST

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विधानपरिषदेसाठी नाट्यमय ठरला. अगोदर सुषमा अंधारे यांच्यावर सभागृह संतप्त झाले असताना विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांमुळे व्यथित झालेल्या कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहातच खिशातून कागद बाहेर काढत राजिनामा देऊन पद सोडण्याची तयारी दाखवली. मागील तीन दशकांपासून सभागृहात असून मी कुठलाही गैरप्रकार केलेला नाही. माझ्यावर किंवा कुटुंबियांवर अनियमिततेचे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हानच त्यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान दानवे यांनी लोढा यांच्यावर आरोप केले. मंत्री लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या, असं अंबादास दानवे म्हणाले. यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर लोढा यांचे नाव आपण मागे घेत असल्याचं दानवे म्हणाले. पण त्यानंतर लोढा यांचे नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या. काही वेळाने लोढा सभागृहात आले व त्यांनी अनपेक्षितच कृत्य केले. मागील १० वर्षांपासून मी कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय नाही. माझ्या कुटुंबाकडून सर्व नियमे पाळून व्यवसाय करण्यात येतो. कुठलेही बेकायदेशीर काम केले असेल तर माझी राजिनामा देण्याची तयारी आहे, असे म्हणत त्यांनी खिशातून कागद काढला. मी या कोऱ्या कागदावर सही करत राजिमाना देतो असेच ते म्हणाले. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी ३० वर्षांपासून सभागृहात आहे. दानवे पुराव्यांशिवाय वाट्टेल ते आरोप करत आहेत. मी मंत्रीपदाचा कुठलाही दुरुपयोग केलेला नाही. त्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हान लोढा यांनी दिले. यावर दानवे यांनी पुरावे देण्याची तयारी दाखवली. अखेर उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केली. अनेकजण राजिनामा खिशात ठेवतात. मात्र लोढा यांनी राजिनामा देण्याची तयारी दाखवली. दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी लोकपाल, पोलीस यांच्याकडे तक्रार करावी, असे त्या म्हणाल्या.

नोटीस का नाही?या प्रकारावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. सभागृहात कुणाचे नाव घ्यायचे असेल तर नोटीस देण्याचा नियम आहे. नियमांची स्पष्टता असतानाही वारंवार अस का घडतेय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला

टॅग्स :nagpurनागपूरMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढा