शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

‘मंगल भवन अमंगल हारी’... पुन्हा गुंजले तेच मधूर स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:07 IST

‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.

ठळक मुद्दे‘रामायण’ने केले ‘लॉकडाऊन’पुन: प्रसारणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐंशी-नव्वदच्या काळात अघोषित संचारबंदी करणाऱ्या दूरचित्रवाहिनीवरील ज्या मालिकांचे नावे घेतले जाते, त्यात रामायण व महाभारत या दोन पौराणिक गाथांचा क्रम पहिला लागतो. या दोन्ही मालिकांची जादू अशी काही होती की लोक टीव्हीलाच हार घालक, दिव्यांची ओवाळणी घालत असत. या मालिकांची लोकप्रियता बघता आणि वर्तमानातील लॉकडाऊनचा काळ बघता दूरदर्शनने या दोन्ही मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि ऐंशी-नव्वदच्या दशकातील तिच जादू पुन्हा अनुभवता आली.  ‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.पंतप्रधानांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर वर्दळीत राहायची सवय असलेल्या भारतीयांना एकांतवास सहन होणार नाही, याची जाणिव होतीच. केबलवर सिनेमे बघून बघून किती बघणार आणि घरातील वेळ कसा घालविणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. त्याला उत्तर म्हणून दूरदर्शनने रामायण, व्योमकेश बक्षी, महाभारत, देख भाई देख अशा प्रचंड गाजलेल्या आणि आजही तिच क्रेझ असलेल्या मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने २८ मार्च रोजी रामायण व व्योमकेश बक्षी या मालिकांचे प्रसारण झाले आणि नागरिकांनी या मालिकांचा रसास्वाद घेतला. विशेष म्हणजे रामायण व महाभारत नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र कायम राहिले आहे. त्यामुळे रामायणाच्या प्रसारणाच्या वेळी शहरात अघोषित संचारबंदी दिसून आली. दुपारी १२ वाजता ‘महाभारत’चे प्रसारण होईल, या आशेने अनेकांनी टीव्ही सोडला नव्हता. मात्र, ती अपेक्षा फोल ठरल्याने अनेक नागरिक नाराज झाले.केबल, सेटटॉप बॉक्सवाल्यांची दुकानदारी: कोनोराच्या संक्रमणापासून समाजाला वाचविण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. रामायण, महाभारतचे पुन: प्रसारण हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. मात्र, अशावेळी केबल आॅपरेटर्स व वेगवेगळ्या कंपन्यांचे सेटटॉप बॉक्सवाल्यांनी यावरही दुकानदारी सुरू केल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. केबल वाहिनी व सेटटॉप बॉक्समधून दुरदर्शन गायब झाल्याचे दिसून येत होते.दूरदर्शन नि:शुल्क वाहिनी: विशेष म्हणजे नव्या मापदंडानुसार सरकारकडून शंभर वाहिन्या नि:शुल्क प्रदान केल्या जात आहेत. त्यात दूरदर्शन व संलग्नित बºयाच वाहिन्या आहेत. त्यामुळे, हे चॅनल दाखविणे आवश्यक आहे. मात्र, रामायण व महाभारत मुळे इतर वाहिन्या कुणी बघणार नाही, या हेतूने खाजगी केबलचालकांनी व सेटटॉप बॉक्सवाल्यांनी दुरदर्शन गायब केल्याचे स्पष्ट होत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे............

 

टॅग्स :ramayanरामायण