शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘मंगल भवन अमंगल हारी’... पुन्हा गुंजले तेच मधूर स्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:07 IST

‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.

ठळक मुद्दे‘रामायण’ने केले ‘लॉकडाऊन’पुन: प्रसारणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐंशी-नव्वदच्या काळात अघोषित संचारबंदी करणाऱ्या दूरचित्रवाहिनीवरील ज्या मालिकांचे नावे घेतले जाते, त्यात रामायण व महाभारत या दोन पौराणिक गाथांचा क्रम पहिला लागतो. या दोन्ही मालिकांची जादू अशी काही होती की लोक टीव्हीलाच हार घालक, दिव्यांची ओवाळणी घालत असत. या मालिकांची लोकप्रियता बघता आणि वर्तमानातील लॉकडाऊनचा काळ बघता दूरदर्शनने या दोन्ही मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आणि ऐंशी-नव्वदच्या दशकातील तिच जादू पुन्हा अनुभवता आली.  ‘रामायण’चा पहिला ऐपिसोड सादर झाला आणि अनेक वस्त्या सुनसान झाल्या होत्या. जे सरकारच्या आवाहनाला जमले नाही, ते या मालिकेच्या पहिल्या भागाने करून दाखवले, हे विशेष.पंतप्रधानांनी २१ दिवसाचा लॉकडाऊन पुकारल्यानंतर वर्दळीत राहायची सवय असलेल्या भारतीयांना एकांतवास सहन होणार नाही, याची जाणिव होतीच. केबलवर सिनेमे बघून बघून किती बघणार आणि घरातील वेळ कसा घालविणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. त्याला उत्तर म्हणून दूरदर्शनने रामायण, व्योमकेश बक्षी, महाभारत, देख भाई देख अशा प्रचंड गाजलेल्या आणि आजही तिच क्रेझ असलेल्या मालिकांचे पुन: प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने २८ मार्च रोजी रामायण व व्योमकेश बक्षी या मालिकांचे प्रसारण झाले आणि नागरिकांनी या मालिकांचा रसास्वाद घेतला. विशेष म्हणजे रामायण व महाभारत नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र कायम राहिले आहे. त्यामुळे रामायणाच्या प्रसारणाच्या वेळी शहरात अघोषित संचारबंदी दिसून आली. दुपारी १२ वाजता ‘महाभारत’चे प्रसारण होईल, या आशेने अनेकांनी टीव्ही सोडला नव्हता. मात्र, ती अपेक्षा फोल ठरल्याने अनेक नागरिक नाराज झाले.केबल, सेटटॉप बॉक्सवाल्यांची दुकानदारी: कोनोराच्या संक्रमणापासून समाजाला वाचविण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न केले जात आहेत. रामायण, महाभारतचे पुन: प्रसारण हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. मात्र, अशावेळी केबल आॅपरेटर्स व वेगवेगळ्या कंपन्यांचे सेटटॉप बॉक्सवाल्यांनी यावरही दुकानदारी सुरू केल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. केबल वाहिनी व सेटटॉप बॉक्समधून दुरदर्शन गायब झाल्याचे दिसून येत होते.दूरदर्शन नि:शुल्क वाहिनी: विशेष म्हणजे नव्या मापदंडानुसार सरकारकडून शंभर वाहिन्या नि:शुल्क प्रदान केल्या जात आहेत. त्यात दूरदर्शन व संलग्नित बºयाच वाहिन्या आहेत. त्यामुळे, हे चॅनल दाखविणे आवश्यक आहे. मात्र, रामायण व महाभारत मुळे इतर वाहिन्या कुणी बघणार नाही, या हेतूने खाजगी केबलचालकांनी व सेटटॉप बॉक्सवाल्यांनी दुरदर्शन गायब केल्याचे स्पष्ट होत आहे. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे............

 

टॅग्स :ramayanरामायण