शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश हवा- नितीन गडकरी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 2, 2024 21:47 IST

सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : व्यवसायामध्ये मानवी संबंधांनादेखील खूप महत्त्व आहे. आपण सहकाऱ्यासोबत कसे वागतो, कसे बोलतो, आपले नेतृत्व कसे आहे, यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यामुळे ‘मानवी संबंधांचे व्यवस्थापन’ कसे करायचे याचाही अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

आयआयएम आणि विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्यावतीने आयआयएम, मिहानमध्ये आयोजित दोन दिवसीय सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह ‘सिमकॉन-२०२४’चे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी आयआयएम नागपूर संचालक डॉ. भीमराया मैत्री, मुख्य प्रायोजक व आर.सी. प्लास्टोचे संचालक विशाल अग्रवाल, सेंट्रल स्टार मोटर्सचे के.एस चीमा, व्हीएमएचे अध्यक्ष सौरभ मोहता, व्हीएमएचे श्रीकांत संपत, सिम्कॉनचे सदस्य ब्रिज सारडा आणि आयआयएम नागपूरचे वरिष्ठ प्राध्यापक आलोक कुमार उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, व्यवसाय व व्यवस्थापनासाठी उत्तम तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्या जोरावर यश मिळेल, पण ते तात्कालिक असेल. दीर्घकाळ यशस्वी राहायचे असेल तर मूल्य अधिक महत्त्वाची आहेत. टीमवर्क, वागणूक, विश्वासार्हता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास याला खूप महत्त्व आहे. काही लोक संकटात संधी शोधतात तर काही संधीमध्ये समस्या निर्माण करतात. बरेचदा अहंकार आणि वागणुकीमुळे संपूर्ण चित्र बदललेले आपण बघतो. त्यामुळे मानवी संबंधांनाही तेवढेच महत्त्व आहे. नेतृत्व करणाऱ्यामध्ये योग्य दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. गुणवत्ता, मूल्य, पारदर्शकता कायम ठेवून उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केला पाहिजे.

नेतृत्व, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि मूल्य ही चतु:सूत्रीदेखील व्यवस्थापनाचाच भाग आहे. या चतु:सूत्रीच्या आधारावरच उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील क्षमता ओळखून त्यांचे संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. प्रास्तविकेत डॉ. भीमराया मैत्री यांनी एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते संदीप सिंग यांनी लिहिलेले ‘टेम्पल एकॉनॉमी’ हे पुस्तक गडकरी यांना भेट देण्यात आले. संचालन आयोजन समितीचे अध्यक्ष ब्रिज सारडा यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी