शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भाला मलेरियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 11:08 IST

Nagpur News Health कोरोनाच्या संसर्गाची भीती ओसरत नाही तोच पूर्व विदर्भ मलेरियाच्या विळख्यात सापडला आहे.

ठळक मुद्देमागील वर्षी १८०९ रुग्ण ५ मृत्यू यावर्षी ५८३० रुग्ण १२ मृत्यू गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्हात मोठी वाढ

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या संसर्गाची भीती ओसरत नाही तोच पूर्व विदर्भ मलेरियाच्या विळख्यात सापडला आहे. मागील वर्षी, जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात १८०९ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली होती. या वर्षी तिपटीने वाढ होऊन रुग्णांची संख्या ५८३० तर मृत्यूची संख्या १२ वर पोहचल्याने खळबळ उडाली आहे. विशेषत: गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यााठी मागील आठ महिन्यापासून आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहेत. परिणामी, इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाल्यासारखे झाले आहे. परंतु लांबलेल्या पाऊस व जागोजागी पाणी साचून वाढलेल्या डासांमुळे हिवताप म्हणजेच मलेरियाचे रुग्ण वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दरम्यान भंडारा जिल्ह्यात ६ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात २१७ रुग्ण व ३ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात १५३० रुग्ण व १ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात १० रुग्ण व एक मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ४ रुग्णांची नोंद झाली. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये भंडारा जिल्ह्यात १३ रुग्ण व २ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ३०६ रुग्ण व २ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात १८४ रुग्ण ३ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ५३१९ रुग्ण व ५ मृत्यू, नागपूर जिल्ह्यात ८ रुग्ण तर वर्धा जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

-जुलै महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ

जुलै महिन्यापासून सहाही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत असली तरी गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली. या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १६६९, गोंदिया जिल्ह्यात १६५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ४२ रुग्ण आढळून आले. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ११५३, गोंदिया जिल्ह्यात ८० तर चंद्रपूर जिल्ह्यात ५० रुग्ण, सप्टेंबर महिन्या गडचिरोली जिल्ह्यात ४४०, गोंदिया जिल्ह्यात १५ तर चंद्रपूर जिल्ह्यात २५ रुग्ण तर ऑक्टोबर महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात ४२२ , गोंदिया जिल्ह्यात १३ तर चंद्रपूर जिल्ह्यात १० रुग्ण आढळून आले.

-मागील दोन महिन्यापासून रुग्णसंख्या कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. परंतु मागील दोन महिन्यापासून जनजागृतीवर विशेष भर देण्यात आल्याने व आवश्यक उपाययोजना केल्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.

-डॉ. श्याम निमगडे

सहायक संचालक (हिवताप), आरोग्य विभाग

 

 

टॅग्स :Healthआरोग्य