शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गरीब विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 01:47 IST

मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे.

ठळक मुद्दे वेदप्रकाश आर्य याची मनपा आयुक्तांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मनपा शाळेतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याला १ जुलैपासून सुरुवात केली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत त्यांनाच शिक्षण मिळत आहे. गरीब व मध्यमवर्गातील विद्यार्थी यापासून वंचित आहेत.या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये , यासाठी महापालिका प्रशासनाने त्यांना तात्काळ स्मार्ट फोन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनात केली आहे.मनपाच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसात केलेल्या सर्वेक्षणात स्मार्टफोन असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार नियोजन करणे अपेक्षित होते. परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू करताना या गरीब विद्यार्थ्यांचा विचारच करण्यात आलेला नाही .यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. महापालिका सभागृहात पाच दिवस चर्चा झाली. आरोप-प्रत्यारोप झाले परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महापालिकेची जबाबदारी असताना गरीब विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करण्याबाबतचा विषय साधा चर्चेला आला नाही. मनपा प्रशासनाने आर्थिक परिस्थितीचा विचार न करता निधी उपलब्ध करून गरजू विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन उपलब्ध करावे, अशी मागणी वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मनपाने निधी उपलब्ध करावामहापालिकेतील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करण्यासाठी मनपाने तातडीने निधी उपलब्ध करावा अन्यथा या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. या विद्यार्थ्यांची संख्या ३६०१ इतकी आहे. यात नववीत १११२, दहावीत १९९५ अकरावी २१७ तर बारावीत २७७ विद्यार्थी आहेत. यातील ६० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही. या सर्वांना स्मार्टफोन द्यावा, अशी मागणी माजी शिक्षण सभापती गोपाल बोहरे यांनी केली आहे.

टॅग्स :MobileमोबाइलStudentविद्यार्थीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका