शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता योग्य तो निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:03 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई व राज्य मंडळाच्या नियमात फरक

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी राज्य मंडळाने ३५ टक्के तर, सीबीएसईने ३३ टक्के किमान गुण निश्चित केले आहेत. अशास्थितीत राज्य मंडळाने त्यांच्या इयत्ता अकरावी(विज्ञान)मध्ये सीबीएसई विद्यार्थ्यांना प्रवेश देताना किमान ३३ टक्के गुणांचाच निकष पाळायला पाहिजे, असे मत न्यायालयाने आदेशात व्यक्त केले आहे. संबंधित निर्णय घेताना या मतावर विचार करण्यात यावा, असे मंडळाला सांगण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यासंदर्भात बल्लारपूर येथील रोहित मडावी या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. रोहितने सीबीएसई संलग्नित शाळेमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण केली आहे. त्याला विज्ञान विषयात ३४ टक्के गुण मिळाले आहेत. आता त्याला, राज्य मंडळाशी संलग्नित गुरू नानक विज्ञान महाविद्यालय (बल्लारपूर, जि. चंद्रपूर) येथे प्रवेश घ्यायचा आहे. परंतु, राज्य मंडळाने त्याला प्रवेश नाकारला आहे. न्यायालयाने वरील आदेश देऊन त्याचे प्रकरण पुनर्विचार करण्यासाठी राज्य मंडळाकडे परत पाठविले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संदीप नंदेश्वर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी