शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता योग्य तो निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:03 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई व राज्य मंडळाच्या नियमात फरक

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित केले आहेत. सीबीएसईनुसार ३३ टक्के तर, राज्य मंडळानुसार ३५ टक्के गुण आवश्यक आहे. दहावीनंतर राज्य मंडळाशी संलग्नित विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक सीबीएसई विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. त्यांना प्रवेश नाकारला जात आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या भल्याकरिता या वादावर चार आठवड्यात योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दिला आहे.इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी राज्य मंडळाने ३५ टक्के तर, सीबीएसईने ३३ टक्के किमान गुण निश्चित केले आहेत. अशास्थितीत राज्य मंडळाने त्यांच्या इयत्ता अकरावी(विज्ञान)मध्ये सीबीएसई विद्यार्थ्यांना प्रवेश देताना किमान ३३ टक्के गुणांचाच निकष पाळायला पाहिजे, असे मत न्यायालयाने आदेशात व्यक्त केले आहे. संबंधित निर्णय घेताना या मतावर विचार करण्यात यावा, असे मंडळाला सांगण्यात आले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यासंदर्भात बल्लारपूर येथील रोहित मडावी या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. रोहितने सीबीएसई संलग्नित शाळेमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण केली आहे. त्याला विज्ञान विषयात ३४ टक्के गुण मिळाले आहेत. आता त्याला, राज्य मंडळाशी संलग्नित गुरू नानक विज्ञान महाविद्यालय (बल्लारपूर, जि. चंद्रपूर) येथे प्रवेश घ्यायचा आहे. परंतु, राज्य मंडळाने त्याला प्रवेश नाकारला आहे. न्यायालयाने वरील आदेश देऊन त्याचे प्रकरण पुनर्विचार करण्यासाठी राज्य मंडळाकडे परत पाठविले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. संदीप नंदेश्वर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी