शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:39 IST

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली.

ठळक मुद्देमतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली

योगेश पांडे

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. मात्र पक्षासमोर हीच स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासातून समोर आले होते. याबाबत संघधुरिणांनी सार्वजनिकपणे वक्तव्य केले नव्हते. मतदान न वाढल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल, मात्र मागील वेळच्या तुलनेत जागा घटतील हे संघाचे पदाधिकारी अंतर्गत गोटात दाव्याने सांगत होते. नेमकी हीच बाब खरी ठरली असून संघाचे गणित बरोबर निघाल्याचे दिसून येत आहे.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येदेखील सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यात संघ सक्रिय प्रचारापासून दूर राहिला. परंतु मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते. यानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६६.७५ टक्के मतदान झाल्यानंतर संघाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. जर दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी अशीच राहिली तर पक्षाला बहुमत मिळेल, मात्र शंभरी गाठताना दमछाक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जर मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांहून अधिक गेला तरच ११५ हून अधिक जागा येतील, असे ते म्हणाले होते.मतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकलीगुजरातमध्ये मतदानवाढीसाठी संघाचे प्रयत्न अपुरे पडले. २०१२ च्या निवडणुकांत गुजरातमध्ये ७१.३२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढेल हा संघाचा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्केच मतदान झाले आणि येथेच जागांचे गणित बिघडले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017