शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:39 IST

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली.

ठळक मुद्देमतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली

योगेश पांडे

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. मात्र पक्षासमोर हीच स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासातून समोर आले होते. याबाबत संघधुरिणांनी सार्वजनिकपणे वक्तव्य केले नव्हते. मतदान न वाढल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल, मात्र मागील वेळच्या तुलनेत जागा घटतील हे संघाचे पदाधिकारी अंतर्गत गोटात दाव्याने सांगत होते. नेमकी हीच बाब खरी ठरली असून संघाचे गणित बरोबर निघाल्याचे दिसून येत आहे.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येदेखील सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यात संघ सक्रिय प्रचारापासून दूर राहिला. परंतु मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते. यानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६६.७५ टक्के मतदान झाल्यानंतर संघाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. जर दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी अशीच राहिली तर पक्षाला बहुमत मिळेल, मात्र शंभरी गाठताना दमछाक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जर मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांहून अधिक गेला तरच ११५ हून अधिक जागा येतील, असे ते म्हणाले होते.मतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकलीगुजरातमध्ये मतदानवाढीसाठी संघाचे प्रयत्न अपुरे पडले. २०१२ च्या निवडणुकांत गुजरातमध्ये ७१.३२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढेल हा संघाचा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्केच मतदान झाले आणि येथेच जागांचे गणित बिघडले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017