शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

गुजरातमध्ये बहुमत, पण जागा घटण्याचे संघधुरिणांनी केले होते भाकीत : मतदानवाढीसाठीचे प्रयत्न ठरले अपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:39 IST

गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली.

ठळक मुद्देमतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकली

योगेश पांडे

आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरात निवडणुकांच्या निकालासंदर्भात बहुतांश ‘एक्झिट पोल’चे आकडे चुकीचे ठरले व १०० जागा मिळविताना पक्षाची दमछाक झाली. मात्र पक्षासमोर हीच स्थिती उद्भवणार असल्याचे भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासातून समोर आले होते. याबाबत संघधुरिणांनी सार्वजनिकपणे वक्तव्य केले नव्हते. मतदान न वाढल्यामुळे भाजपला बहुमत मिळेल, मात्र मागील वेळच्या तुलनेत जागा घटतील हे संघाचे पदाधिकारी अंतर्गत गोटात दाव्याने सांगत होते. नेमकी हीच बाब खरी ठरली असून संघाचे गणित बरोबर निघाल्याचे दिसून येत आहे.गुजरातला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात संघाची मौलिक भूमिका राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी उत्तर प्रदेशसह गुजरातमध्येदेखील सक्रियपणे प्रचार केला होता व त्यांचे निकाल जगाने पाहिले होते. त्यानंतर प्रत्येक राज्यात संघ सक्रिय प्रचारापासून दूर राहिला. परंतु मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी संघाने बरेच प्रयत्न केले.गुजरातमध्येदेखील मतदानाचा टक्का वाढावा व भाजपासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी संघ परिवाराच्या विविध संस्थांना पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत होते. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते. स्वयंसेवकांनी भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्यावर भर दिला व ‘हर घर, एक व्होट’ ही मोहीमच राबविण्यात आली. संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजनदेखील करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचनादेखील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीच केली होती.एकीकडे स्वयंसेवक मतदानवाढीसाठी प्रयत्न करत असताना संघाने अंतर्गत सर्वेक्षणदेखील केले होते. यानुसार मतदानाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६६.७५ टक्के मतदान झाल्यानंतर संघाच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले होते. जर दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी अशीच राहिली तर पक्षाला बहुमत मिळेल, मात्र शंभरी गाठताना दमछाक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. जर मतदानाचा आकडा ७२ टक्क्यांहून अधिक गेला तरच ११५ हून अधिक जागा येतील, असे ते म्हणाले होते.मतदानवाढीची ‘बेरीज वजाबाकी’ चुकलीगुजरातमध्ये मतदानवाढीसाठी संघाचे प्रयत्न अपुरे पडले. २०१२ च्या निवडणुकांत गुजरातमध्ये ७१.३२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा आकडा वाढेल हा संघाचा अंदाज फोल ठरला. गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्केच मतदान झाले आणि येथेच जागांचे गणित बिघडले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017