शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वीज वितरण प्रणालीतील मेंटेनन्स शंकेच्या विळख्यात : शहरासह जिल्ह्यावर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:42 IST

बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणाला आठवले बेरोजगार अभियंता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुटीबोरी येथे देखभालीच्या (मेंटेनन्स) नावावर बुधवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. यामुळे नंतर वितरण प्रणालीत समस्या येणार नाही, ही अपेक्षा होती. परंतु रात्री १२.३० वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. महावितरण यावर, जम्पर तुटल्याचे सांगत आहे. मात्र, मेंटेनन्सच्याच दिवशी हे तुटलेच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रामदासपेठ, जयताळासह शहरातील अन्य भागालाही याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने जेव्हा ‘मेंटेनन्सबाबत माहिती घेतली, तेव्हा या वर्षी मेंटेनन्सची निविदाच निघाली नसल्याचे पुढे आले. महावितरणने तीन वर्षांसाठी मेंटेनन्साठी निविदा मागविल्या होत्या. परंतु याच्या किमती खूप जास्त असल्याने कंत्राटदारांनी या निविदाच भरल्या नाहीत. या दरम्यान विनातयारी व पुरेसे मनुष्यबळ नसताना महावितरणने पावसाळ्यापूर्वीच्या कामाची तयारी सुरू केली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, हे काम जुने कंत्राटदार करीत आहे.सूत्रानुसार, जुन्या कंत्राटदाराने नवीन निविदेसाठी अर्जच केला नाही. त्याने योग्यपद्धतीने मेंटेनन्सचे काम केले नसल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, देखभालीच्या नावाखाली वीज बंद केली जात असल्यचाही आरोप होत आहे.विजेची मोठी रक्कम मोजूनही नागरिक त्रस्तहवा चालल्याने किंवा पाऊस आल्याने अचानक वीजपुरवठा बंद होतो. विजेची मोठी रक्कम भरूनही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. या समस्येला घेऊन महावितरणने २६ मार्च २०१५ रोजी अध्यादेश काढून बेरोजगार अभियंत्यांची यात मदत घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनीही याबाबत निर्देश दिले होते. त्यांनी वेगळे ‘पोर्टल’ही तयार करण्याच्याही सूचना दिल्या होत्या.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज