शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी जपून वापरा : मनपाचा ईशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:55 IST

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.

ठळक मुद्देमे अखेरपर्र्यंत अडचण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या ९० टीएमसी जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ०.७ टीएमसी पाण्याची गरज आहे. याचा विचार करता ३१ मे पर्यंत शहरात पाण्याची अडचण जाणार नाही. कन्हान नदी पात्रातील प्रवाह कमी झाला आहे. परंतु नेटवर्क भागात तूर्त पाण्याची अडचण दिसत नाही. नॉननेटवर्क भागात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरची मागणी वाढली आहे.गोरेवाडा व कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शहरात दररोज ६४० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. कन्हानमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने गेल्या दोन महिन्यात अनेकदा अघोषित पाणीकपात करण्यात आली. याचा विचार करता महापालिकेने विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.नळाच्या पाण्याचा उपयोग फक्त पिण्यासाठी करावा,असे आवाहन जलप्रदाय विभागाने केले आहे. वाहने, कपडे व भांडी धुण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकजण वाहने व कपडे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. याला आळा बसण्याची गरज आहे.गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठामानकानुसार प्रतिव्यक्ती दररोज जास्तीतजास्त १३५ लिटर पाण्याची गरज भासते. परंतु शहराला होणारा पाणीपुरवठा विचारात घेता प्रतिव्यक्ती दररोज २५० लिटर पाणीपुरवठा के ला जात आहे. मानकाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. असे असूनही शहरातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. होणारा पाणीपुरवठा विचारात घेता अशी परिस्थिती का निर्माण झाली असा प्रश्न निर्माण होतो.पर्यायी जलस्रोतासाठी प्रयत्नशहरातील ७८४ विहिरींचा सर्वे करून ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली. ५४८ विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठविण्यात आले. होते. परंतु यातील ९९ टक्के नमुने दूषित आढळून आले. हा नागरिकांसाठी धोक्याचा इशारा आहे.शहरात ५२५४ बोअरवेल आहेत. त्या दुरुस्त व रिचार्ज करण्याचे काम जलप्रदाय विभागाने हाती घेतले आहे. ३४७ बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी चार कंत्राटदार नियुक्त केले आहेत. तसेच बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून वापरात आणण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी