शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

पिण्याचे पाणी जपून वापरा : मनपाचा ईशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:55 IST

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.

ठळक मुद्देमे अखेरपर्र्यंत अडचण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या ९० टीएमसी जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ०.७ टीएमसी पाण्याची गरज आहे. याचा विचार करता ३१ मे पर्यंत शहरात पाण्याची अडचण जाणार नाही. कन्हान नदी पात्रातील प्रवाह कमी झाला आहे. परंतु नेटवर्क भागात तूर्त पाण्याची अडचण दिसत नाही. नॉननेटवर्क भागात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरची मागणी वाढली आहे.गोरेवाडा व कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शहरात दररोज ६४० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. कन्हानमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने गेल्या दोन महिन्यात अनेकदा अघोषित पाणीकपात करण्यात आली. याचा विचार करता महापालिकेने विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.नळाच्या पाण्याचा उपयोग फक्त पिण्यासाठी करावा,असे आवाहन जलप्रदाय विभागाने केले आहे. वाहने, कपडे व भांडी धुण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकजण वाहने व कपडे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. याला आळा बसण्याची गरज आहे.गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठामानकानुसार प्रतिव्यक्ती दररोज जास्तीतजास्त १३५ लिटर पाण्याची गरज भासते. परंतु शहराला होणारा पाणीपुरवठा विचारात घेता प्रतिव्यक्ती दररोज २५० लिटर पाणीपुरवठा के ला जात आहे. मानकाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. असे असूनही शहरातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. होणारा पाणीपुरवठा विचारात घेता अशी परिस्थिती का निर्माण झाली असा प्रश्न निर्माण होतो.पर्यायी जलस्रोतासाठी प्रयत्नशहरातील ७८४ विहिरींचा सर्वे करून ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली. ५४८ विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठविण्यात आले. होते. परंतु यातील ९९ टक्के नमुने दूषित आढळून आले. हा नागरिकांसाठी धोक्याचा इशारा आहे.शहरात ५२५४ बोअरवेल आहेत. त्या दुरुस्त व रिचार्ज करण्याचे काम जलप्रदाय विभागाने हाती घेतले आहे. ३४७ बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी चार कंत्राटदार नियुक्त केले आहेत. तसेच बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून वापरात आणण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी