शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पिण्याचे पाणी जपून वापरा : मनपाचा ईशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:55 IST

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.

ठळक मुद्देमे अखेरपर्र्यंत अडचण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. साहजिकच शहरातील पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांत आक्रोशही निर्माण होतो. हा विचार करून महापालिका प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा वापर जरा जपूनच करण्याचे आवाहन केले आहे.. पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी विहीर, बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठा विचारात घेता ३१ मे पर्यंत शहराला कोणत्याही स्वरुपाची अडचण जाणार नाही, असा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. असे असले तरी पाण्याचा काटकसरीने करावा, असे मनपाने म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या ९० टीएमसी जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ०.७ टीएमसी पाण्याची गरज आहे. याचा विचार करता ३१ मे पर्यंत शहरात पाण्याची अडचण जाणार नाही. कन्हान नदी पात्रातील प्रवाह कमी झाला आहे. परंतु नेटवर्क भागात तूर्त पाण्याची अडचण दिसत नाही. नॉननेटवर्क भागात टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकरची मागणी वाढली आहे.गोरेवाडा व कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शहरात दररोज ६४० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. कन्हानमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने गेल्या दोन महिन्यात अनेकदा अघोषित पाणीकपात करण्यात आली. याचा विचार करता महापालिकेने विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.नळाच्या पाण्याचा उपयोग फक्त पिण्यासाठी करावा,असे आवाहन जलप्रदाय विभागाने केले आहे. वाहने, कपडे व भांडी धुण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकजण वाहने व कपडे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. याला आळा बसण्याची गरज आहे.गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठामानकानुसार प्रतिव्यक्ती दररोज जास्तीतजास्त १३५ लिटर पाण्याची गरज भासते. परंतु शहराला होणारा पाणीपुरवठा विचारात घेता प्रतिव्यक्ती दररोज २५० लिटर पाणीपुरवठा के ला जात आहे. मानकाच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. असे असूनही शहरातील अनेक भागात पाणीटंचाईची परिस्थिती आहे. होणारा पाणीपुरवठा विचारात घेता अशी परिस्थिती का निर्माण झाली असा प्रश्न निर्माण होतो.पर्यायी जलस्रोतासाठी प्रयत्नशहरातील ७८४ विहिरींचा सर्वे करून ३४३ विहिरींची सफाई करण्यात आली. ५४८ विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासण्यासाठी पाठविण्यात आले. होते. परंतु यातील ९९ टक्के नमुने दूषित आढळून आले. हा नागरिकांसाठी धोक्याचा इशारा आहे.शहरात ५२५४ बोअरवेल आहेत. त्या दुरुस्त व रिचार्ज करण्याचे काम जलप्रदाय विभागाने हाती घेतले आहे. ३४७ बोअरवेलचे खोदकाम करण्यासाठी चार कंत्राटदार नियुक्त केले आहेत. तसेच बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून वापरात आणण्याचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी