शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

२१ व्या शतकात पर्यावरणातील प्रदूषण मुख्य आव्हान : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:16 IST

२१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक, देश-विदेशातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक(निर्मिती) चंद्रकांत थोटवे, पर्यावरण तज्ज्ञ तथा एनजीओचे संस्थापकदेबी गोयंका, अरुण कृष्णमूर्ती, माजी कुलगुरूडॉ. विलास सपकाळ, मुख्य शास्त्रज्ञ श्रीपाल सिंग, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येवूल, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ डी. एम. शिवणकर, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मुख्य अभियंता राजू घुगे, कार्यकारी संचालक राजू बुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तापमान वाढीच्या परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही आज सर्व जगाची समस्या बनली आहे. तीव्र वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठे संकट आहे. दुष्काळात तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे. शहरात वाहतुकीमुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उद्योगधंद्यामुळे नदी-नालेदेखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. यावर उपाय म्हणून शासनासोबतच नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी समोर यावे. पर्यावरण रक्षण हे जनआंदोलन व्हावे. आपल्या देशाला सौर ऊर्जेचे वरदान मिळाले आहे. यासाठी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे. जुन्या तंत्रज्ञानाला बाजूला सारून विविध उद्योगधंदे, हॉटेल्स, दवाखाने, शाळा येथील सर्व व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ देबी गोयंका, डॉ. साधना रायलू, डॉ. संजय ढोबळे, डॉ. नीरज खटी, डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.संजय दानव, डॉ.अश्विनी दानव-बोधाने यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पर्यावरण क्षेत्राशी निगडित असलेले ज्वलंत विषय, जनजागृती व जाणिवा निर्माण करण्यासाठी पर्यावरण, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ रसायनशास्त्रज्ञ अधिकारी-अभियंते तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ तसेच महानिर्मिती, निरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर विद्यापीठ व पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे अधिकारी, अभियंता, प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.प्रत्येक घरी दोन झाडे द्यापर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी लहान-लहान गोष्टीतूनही काम करता येते. महाजेनकोने वृक्षारोपण करण्यासाठी जिल्हा टारगेट करावा. प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्याचा उपक्रम राबवावा. महाजेनकोने रोपवाटिका विकसित कराव्यात. आपले शहर पर्यावरणपूरक बनावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टीकचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. वीज प्रकल्प क्षेत्रातील नाले जोड प्रकल्प राबवण्याबाबतही विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.संशोधनासाठी प्रोत्साहनपर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणऱ्यांना शासनाच्यावतीने प्रोत्साहन दिले जात आहे. एक टीम नुकतीच कॅलिफोर्नियाला अभ्यासासाठी पाठवण्यात आली होती. तेव्हा पर्यावरणविषयक अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमीने समोर यावे, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले

टॅग्स :environmentवातावरणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे