शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

२१ व्या शतकात पर्यावरणातील प्रदूषण मुख्य आव्हान : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:16 IST

२१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देपर्यावरण रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक, देश-विदेशातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २१ व्या शतकातील पर्यावरणातील प्रदूषण हे प्रमुख आव्हान आहे. समाजामध्ये पर्यावरणाची समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पर्यावरणासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करून पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महानिर्मितीच्या विद्यमाने चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘औष्णिक ऊर्जा : रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण- २०१९’ या विषयावर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद बुधवारी हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक(निर्मिती) चंद्रकांत थोटवे, पर्यावरण तज्ज्ञ तथा एनजीओचे संस्थापकदेबी गोयंका, अरुण कृष्णमूर्ती, माजी कुलगुरूडॉ. विलास सपकाळ, मुख्य शास्त्रज्ञ श्रीपाल सिंग, वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येवूल, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ डी. एम. शिवणकर, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मुख्य अभियंता राजू घुगे, कार्यकारी संचालक राजू बुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तापमान वाढीच्या परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही आज सर्व जगाची समस्या बनली आहे. तीव्र वातावरणीय बदलामुळे शेतीवर मोठे संकट आहे. दुष्काळात तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात आहे. शहरात वाहतुकीमुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या उद्योगधंद्यामुळे नदी-नालेदेखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. यावर उपाय म्हणून शासनासोबतच नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी समोर यावे. पर्यावरण रक्षण हे जनआंदोलन व्हावे. आपल्या देशाला सौर ऊर्जेचे वरदान मिळाले आहे. यासाठी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे. जुन्या तंत्रज्ञानाला बाजूला सारून विविध उद्योगधंदे, हॉटेल्स, दवाखाने, शाळा येथील सर्व व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ देबी गोयंका, डॉ. साधना रायलू, डॉ. संजय ढोबळे, डॉ. नीरज खटी, डॉ.बागची, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.संजय दानव, डॉ.अश्विनी दानव-बोधाने यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पर्यावरण क्षेत्राशी निगडित असलेले ज्वलंत विषय, जनजागृती व जाणिवा निर्माण करण्यासाठी पर्यावरण, विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ रसायनशास्त्रज्ञ अधिकारी-अभियंते तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ तसेच महानिर्मिती, निरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर विद्यापीठ व पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे अधिकारी, अभियंता, प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.प्रत्येक घरी दोन झाडे द्यापर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी लहान-लहान गोष्टीतूनही काम करता येते. महाजेनकोने वृक्षारोपण करण्यासाठी जिल्हा टारगेट करावा. प्रत्येक घरासमोर दोन झाडे लावण्याचा उपक्रम राबवावा. महाजेनकोने रोपवाटिका विकसित कराव्यात. आपले शहर पर्यावरणपूरक बनावे यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्लास्टीकचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. वायू प्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पर्यावरणाचे काम हे देशसेवेचे काम असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. वीज प्रकल्प क्षेत्रातील नाले जोड प्रकल्प राबवण्याबाबतही विचार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.संशोधनासाठी प्रोत्साहनपर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणऱ्यांना शासनाच्यावतीने प्रोत्साहन दिले जात आहे. एक टीम नुकतीच कॅलिफोर्नियाला अभ्यासासाठी पाठवण्यात आली होती. तेव्हा पर्यावरणविषयक अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमीने समोर यावे, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले

टॅग्स :environmentवातावरणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे