शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:06 IST

चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.

ठळक मुद्देआरोपी आसिफने सत्य दडविल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.आसिफने ३० एप्रिलला रात्री मानकापूर ठाण्याजवळ शिवनगरात २० वर्षीय महिमाचा खून केला होता. आसिफ आधी मानकापूर परिसरात राहत होता. त्याचे दोन-तीन वर्षे महिमासोबत प्रेमसंबंध होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही दीड वर्षापूर्वी पती-पत्नीसारखे राहु लागले. महिमाला कुटुंबीय आणि इतर नागरिकांनी आसिफपासून दूर राहण्याबाबत समजवले होते, परंतु तिने कुणाचेच ऐकले नाही. पाच-सहा महिन्यानंतर दोघात भांडणे होऊ लागली होती. महिमा आसिफला सोडून आईवडिलांच्या घरी राहू लागली. महिमा गेल्यानंतर आसिफला तिचे इतरासोबत प्रेमसंबंध असल्याची शंका येऊ लागली. या गोष्टीवरून तो महिमासोबत वाद घालत होता. महिमाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. ३० एप्रिलला रात्री आसिफने चर्चा करण्याच्या बहाण्याने महिमाला घराजवळ बोलावले. आसिफच्या मते त्याने महिमाला सोबत राहण्यासाठी समजावले. तिने नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान त्याने महिमाचा खून केला. त्याने महिमाचा गळा कापला होता. आसिफच्या मते तो महिमावर प्रेम करायचा. त्यामुळे अशा पद्धतीने त्याने तिचा खून करणे आश्चर्याची बाब आहे. यात आसिफ खरी हकीकत लपवित असल्याची शंका पोलिसांना आहे. तो ३ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. महिमाच्या खुनामुळे मानकापूर ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर