शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात चारित्र्यावर संशय घेऊन महिमाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:06 IST

चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.

ठळक मुद्देआरोपी आसिफने सत्य दडविल्याची शंका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चारित्र्यावर संशय आल्यामुळे आसिफ ताज याने महिमा विटोलेचा खून केला. प्रेम विवाहाच्या दीड वर्षानंतरच पत्नीची हत्या करणारा आसिफ पकडल्यानंतर मानसिक तणावात असल्याचे सांगत आहे. प्रकरणातील सत्यता लपविण्यासाठी तो लपवाछपवी करीत असल्याची शंका आहे.आसिफने ३० एप्रिलला रात्री मानकापूर ठाण्याजवळ शिवनगरात २० वर्षीय महिमाचा खून केला होता. आसिफ आधी मानकापूर परिसरात राहत होता. त्याचे दोन-तीन वर्षे महिमासोबत प्रेमसंबंध होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही दीड वर्षापूर्वी पती-पत्नीसारखे राहु लागले. महिमाला कुटुंबीय आणि इतर नागरिकांनी आसिफपासून दूर राहण्याबाबत समजवले होते, परंतु तिने कुणाचेच ऐकले नाही. पाच-सहा महिन्यानंतर दोघात भांडणे होऊ लागली होती. महिमा आसिफला सोडून आईवडिलांच्या घरी राहू लागली. महिमा गेल्यानंतर आसिफला तिचे इतरासोबत प्रेमसंबंध असल्याची शंका येऊ लागली. या गोष्टीवरून तो महिमासोबत वाद घालत होता. महिमाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला होता. ३० एप्रिलला रात्री आसिफने चर्चा करण्याच्या बहाण्याने महिमाला घराजवळ बोलावले. आसिफच्या मते त्याने महिमाला सोबत राहण्यासाठी समजावले. तिने नकार दिला. दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान त्याने महिमाचा खून केला. त्याने महिमाचा गळा कापला होता. आसिफच्या मते तो महिमावर प्रेम करायचा. त्यामुळे अशा पद्धतीने त्याने तिचा खून करणे आश्चर्याची बाब आहे. यात आसिफ खरी हकीकत लपवित असल्याची शंका पोलिसांना आहे. तो ३ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. महिमाच्या खुनामुळे मानकापूर ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर