शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
3
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
4
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
5
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
6
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
7
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
8
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
9
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
10
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
11
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
12
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
13
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
14
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
15
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
16
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
17
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

महावितरण :साध्या हवेनेही यंत्रणा कोलमडत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 20:34 IST

नागपूर शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून रोजी सुद्धा शहरातील अनेक भागातील वीज बंद ठेवली जाणार आहे. यादरम्यान देखभाल दुरुस्तीचे अत्यावश्यक कामे केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देमान्सून पूर्व तयारी संपतच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात मान्सून दाखल झाला आहे. परंतु वीज वितरण कंपनी महावितरण कदाचित हे मानायलाच तयार नाही. कारण महावितरणतर्फे अजुनही मान्सूनपूर्व तयारी संपलेली नाही. नियमानुसार मान्सून पूर्व तयारीची कामे ३१ मे पर्यंत संपायला हवीत. परंतु येत्या बुधवारी २६ जून रोजी सुद्धा शहरातील अनेक भागातील वीज बंद ठेवली जाणार आहे. यादरम्यान देखभाल दुरुस्तीचे अत्यावश्यक कामे केली जाणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.पावसाळ्यात वीज पूरवठा सुरळीत रहावा, या कारणासाठी महावितरणतर्फे दर बुधवारी देखभाल दुरुस्तीच्या नावावर वीज बंद ठेवली जात होती. शहरातील नागरिकांनी भविष्यात विजेची समस्या निर्माण होणार नाही, या अपेक्षेने पूर्ण उन्हाळ्यात बुधवारच्या दिवस अनेक तास विजेशिवाय घालवला. महावितरणने अधिक काम असल्याच्या नावावर बुधवारशिवाय इतर दिवशीही आऊटेज (कामासाठी वीज बंद ठेवणे) घेतले. नागरिकांना हा त्रासही सहन केला. परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही. साधी हवेमुळेही वीज पूरवठा ठप्प होत आहे. बुटीबोरी येथे रविवारी रात्री पावसामुळे विजेचा खांब वाकला. तो सरळ करण्याचे काम सोमवारी करण्यात आले. पहिल्या पावसातच विजेचा खांब वाकल्या जातो. थोडी हवा आली की वीज पूरवठा खंडीत होतो. जम्पर-कंडक्टर तुटताहेत. विजेचे तार अजुनही लोबकळत आहेत. झाडांच्या फांद्या पहिल्या पावसातच तुटून पडताहेत. तेव्हा महावितरणने मान्सूनपूर्व तयारीत नेमके केले तरी काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.सूत्रानुसार मेंटनन्सचे टेंडर काढण्यात आले सल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दर अधिक असल्याने एजन्सी काम करायला तयारी नाही. गेल्या वेळी टेंर घेणाऱ्या एजन्सीला विनंती करून काम करवून घेतले जात आहे. यामुळे काम प्रभावित झाले. कंपनीकडे पर्याप्त मनुष्यबळ नाही. तसेच यंत्र सामग्रीही नाही. अशा परिस्थितीत महावितरणचा असा दावा आहे की, दर बुधवारी मेंटनन्सचे काम होत आहे. वीज लाईनच्या आजुबाजुला झाडांची संख्या अधिक असल्याने फांद्या छाटण्यात वेळ लागत आहे. फांद्या वाढल्याने त्या वारंवार कापाव्या लागत आहे.बुधवारीही वीज पुरवठा बंददरम्यान अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार २६ जून रोजी त्रिमूर्तीनगर, जयताळा, जयप्रकाशनगर येथील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत जयप्रकाशनगर, गांगुली ले-आऊट, राजीव नगर, राहुलनगर, त्रिमूर्तीनगर, भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, मनीष ले-आऊट, पाटील ले-आऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, जयबद्रीनाथ, तलमले ले-आऊट, भांगे विहार, शहाणे ले-आऊट, सुर्वेनगर, गावंडे ले आऊट, टेलिकॉमनगर, शंकरनगर, रवींद्रनगर, कापोर्रेशन कॉलनी, बालजगत परिसर, लक्ष्मीनगर, नीरी परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७. ३० ते १०. ३० या वेळेत शेगावनगर, शिर्डीनगर, जयहिंद सोसायटी, नरसाळा, बहादुरा, बाबा ताजनगर, मिलन नगर, दीनदयालनगर, स्वावलंबीनगर, पडोळे कॉर्नर, लोकसेवानगर, भामटी, कापसे ले-आऊट, राजापेठ, हुडकेश्ववर, विठ्ठलवाडी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, छत्रपतीनगर, सहकारनगर, प्रशांतनगर, हिंदुस्थान कॉलनी, राहुलनगर, वाडी, दत्तवाडी, सत्यसाई सोसायटी, शिवशक्तीनगर, वेणानगर, आंबेडकरनगर, अंबाझरीचा काही भाग, गिरीपेठ, गोकुळपेठ, धरमपेठ येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७. ३० ते ११ या वेळेत एकात्मतानगर, पूजा ले-आऊट, दादाजीनगर, कबीरनगर, जनहित सोसायटी, शिवणगाव, भोसले नगर, पंचशीलनगर, बिट्टूनगर, सकाळी ८ ते ९ या वेळेत रामदासपेठ परिसर, सकाळची ८ ते १० या वेळात कुंभारटोली, जोशीवाडी, नागजीभाई टाऊन येथील वीज पुरवठा बंद राहील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज