शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

मविआचा ३३ जागांवर पेच, विदर्भातील चित्र; २९ जागांवर एकाच पक्षाने दावा केल्यामुळे मार्ग मोकळा

By कमलेश वानखेडे | Updated: September 17, 2024 08:17 IST

उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे. 

कमलेश वानखेडे

नागपूर : महाविकास आघाडीच्या विदर्भातील जागा वाटपात सुमारे ५० टक्के जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. विदर्भातील ६२ पैकी २९ जागांवर  कोणत्याही एकाच पक्षाने दावा केला असल्यामुळे या जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित ३३ जागांवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा केला असल्यामुळे या जागांवरील पेच कायम आहे. 

विदर्भातील जागा वाटपात काँग्रेस नमते घेण्यास तयार नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये आजवर झालेल्या बैठकीत २९ जागा  निकाली निघाल्या आहेत. यामध्ये काँग्रेसच्या २४ जागा आहेत. शरद पवार गटाच्या चार, तर उद्धवसेनेच्या वाट्याची एकमेव जागा ‘क्लीअर’ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण - पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर या  मतदारसंघांमध्ये एकाच पक्षाने दावा केला. प्रदेश काँग्रेसच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या संबंधाने दुजोरा दिला आहे. 

या जागांचा मार्ग मोकळा

नागपूर : काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर

भंडारा : साकोली

गोंदिया : आमगाव

चंद्रपूर :  चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा

वर्धा : देवळी

अमरावती :  तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा

यवतमाळ : आर्णी, राळेगाव, उमरखेड, पुसद

अकोला :  बाळापूर, अकोला व अकोला पूर्व

बुलढाणा : मलकापूर, खामगाव व शिंदखेडा राजा 

वाशिम : रिसोड

महायुतीत ७० टक्के जागांवर झाले एकमत

नागपूर : महायुतीच्या तीनही नेत्यांनी जागा वाटपासाठी ८० किंवा ९० अशा कुठल्याही आकड्याचा आग्रह धरलेला नाही. जेथे अजित पवार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह, जिथे शिंदे सेनेचे आमदार जिंकतील तेथे त्यांचा आग्रह व  जेथे भाजपचे उमेदवार जिंकतील तेथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही  जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फॉर्म्युला’ निश्चित केला असून, आजवर ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे  सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,  उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे सत्ता दिली. ते कधी मंत्रालयात गेले नाहीत. विधानभवनातही गेले नाहीत. ते आता जुनी पेन्शन देऊ, असे खोटे बोलत आहेत. आमचे सरकार सगळे

प्रश्न सोडवत आहे. सोयाबीन, बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला. पीक हातात आल्यावर शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला लवकरच दिसेल.

‘काँग्रेसचा खरा चेहरा आला समोर’ 

संजय गायकवाड यांचे समर्थन करत नाही.  आरक्षण रद्द करू, असे राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढ्यांच्या पोटात जे होते ते आज ओठावर आले.

काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. आरक्षणाचे मारेकरी काँग्रेसच आहे. जरांगे - पाटील यांनीसुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024BJPभाजपाShiv Senaशिवसेना