शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे

By admin | Updated: March 7, 2017 02:22 IST

महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार ...

प्रल्हाद लुलेकर : विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालानागपूर : महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले. स्त्रीशिक्षण, त्यांना समान अधिकार, शेतकऱ्यांची परिस्थिती व शासनव्यवस्था चालविताना घ्यावयाच्या धोरणात्मक गोष्टींचे विवेचन त्यांनी केले आहे. त्या काळात असलेले प्रश्न आजही या देशात आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यकाळातही नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि फुलेंच्या कार्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचे वर्तमानकाळात महत्त्व’ या विषयावर डॉ. लुलेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपला विषय मांडताना डॉ. लुलेकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची अनेक उदाहरणे दिली. मुलगी शिकली तर समाज नासेल, या भारतीय संस्कृतीत रुजलेल्या विचारांना त्यांनी आव्हान दिले व देशातील पहिली मुलींची शाळा काढली. १८५८ पर्यंत पुण्यात मुलींच्या ३५ शाळा त्यांनी सुरू केल्या. जाती, समाजाच्या वस्त्या लक्षात घेऊन फुले दाम्पत्याने अभ्यासक्रम तयार केला. ब्रिटिश शासनाला धोरणात्मक बाबी समजावून सांगितल्या. त्या काळातही नोकऱ्यांची कमतरता लक्षात घेता त्यांनी व्यापारिक शिक्षणावर भर दिला. समाजात खालच्या वर्गाचे होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर आराखडा सादर केला. जोतिबांनी कार्ल मार्क्सच्या आधी शोषणाचे सत्य मांडले. धर्माच्या मागे अर्थकारण असते हे विचार त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या स्थितीसाठी त्यांनी त्यावेळी दिलेली कारणे आणि सुचविलेले उपाय आजही कालप्रभावी असल्याचे मत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केले. स्त्री ही जन्मदात्री आहे म्हणून नाही तर कामाचा व्याप आणि बुद्धिमत्तेनेही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ठाम मत फुले यांचे होते. त्यामुळे तिला अर्धांगिनी म्हणून नाही तर माणूस म्हणून समाजात स्वीकारले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पुरोहितांशिवाय कमी खर्चात विवाह करण्याचे सूत्र त्यांनी सांगितले आणि आज विवाहावर कोट्यवधीचा खर्च केला जातो. कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञान, त्यांना विहिरी बांधण्यास प्रोत्साहन देण्याच्या धोरणात्मक गोष्टी त्यांनी सुचविल्या. या महापुरुषाचा मुलगा परिस्थितीमुळे मृत्यू पावला व सुनेला भीक मागत मरावे लागले, ही महाराष्ट्राची शोकांतिका असल्याची खंत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केली. आज भारतासह जगात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता मिळविली जात आहे. अस्मितेच्या प्रश्नात गुंतविले जात आहे. यावेळी अध्यक्षीय विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनीकेले. प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संचालन प्रा. मनोज कासारे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभारप्रदर्शन केले.(प्रतिनिधी)