शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे

By admin | Updated: March 7, 2017 02:22 IST

महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार ...

प्रल्हाद लुलेकर : विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालानागपूर : महात्मा जोतिबा फुले यांनी १९ व्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेचे सूक्ष्म निरीक्षण करून समानतेचे विचार मांडले. स्त्रीशिक्षण, त्यांना समान अधिकार, शेतकऱ्यांची परिस्थिती व शासनव्यवस्था चालविताना घ्यावयाच्या धोरणात्मक गोष्टींचे विवेचन त्यांनी केले आहे. त्या काळात असलेले प्रश्न आजही या देशात आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यकाळातही नितांत आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि फुलेंच्या कार्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे महात्मा जोतिबा फुले स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचे वर्तमानकाळात महत्त्व’ या विषयावर डॉ. लुलेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपला विषय मांडताना डॉ. लुलेकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची अनेक उदाहरणे दिली. मुलगी शिकली तर समाज नासेल, या भारतीय संस्कृतीत रुजलेल्या विचारांना त्यांनी आव्हान दिले व देशातील पहिली मुलींची शाळा काढली. १८५८ पर्यंत पुण्यात मुलींच्या ३५ शाळा त्यांनी सुरू केल्या. जाती, समाजाच्या वस्त्या लक्षात घेऊन फुले दाम्पत्याने अभ्यासक्रम तयार केला. ब्रिटिश शासनाला धोरणात्मक बाबी समजावून सांगितल्या. त्या काळातही नोकऱ्यांची कमतरता लक्षात घेता त्यांनी व्यापारिक शिक्षणावर भर दिला. समाजात खालच्या वर्गाचे होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर आराखडा सादर केला. जोतिबांनी कार्ल मार्क्सच्या आधी शोषणाचे सत्य मांडले. धर्माच्या मागे अर्थकारण असते हे विचार त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या स्थितीसाठी त्यांनी त्यावेळी दिलेली कारणे आणि सुचविलेले उपाय आजही कालप्रभावी असल्याचे मत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केले. स्त्री ही जन्मदात्री आहे म्हणून नाही तर कामाचा व्याप आणि बुद्धिमत्तेनेही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे ठाम मत फुले यांचे होते. त्यामुळे तिला अर्धांगिनी म्हणून नाही तर माणूस म्हणून समाजात स्वीकारले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पुरोहितांशिवाय कमी खर्चात विवाह करण्याचे सूत्र त्यांनी सांगितले आणि आज विवाहावर कोट्यवधीचा खर्च केला जातो. कामगारांचे हक्क, शेतकऱ्यांसाठी नवतंत्रज्ञान, त्यांना विहिरी बांधण्यास प्रोत्साहन देण्याच्या धोरणात्मक गोष्टी त्यांनी सुचविल्या. या महापुरुषाचा मुलगा परिस्थितीमुळे मृत्यू पावला व सुनेला भीक मागत मरावे लागले, ही महाराष्ट्राची शोकांतिका असल्याची खंत डॉ. लुलेकर यांनी व्यक्त केली. आज भारतासह जगात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्ता मिळविली जात आहे. अस्मितेच्या प्रश्नात गुंतविले जात आहे. यावेळी अध्यक्षीय विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांनीकेले. प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. संचालन प्रा. मनोज कासारे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभारप्रदर्शन केले.(प्रतिनिधी)