लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सत्य व अहिंसेची शिकवण संपूर्ण जगाच्या शांततेसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केले. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने व्हेरायटी चौक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. अॅड. अभिजित वंजारी, प्रदेश चिटणीस विशाल मुत्तेमवार, प्रधान महामंत्री डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, प्रशांत धवड, रश्मी धुर्वे, संदेश सिंगलकर, दयाल जशनानी, इरशाद अली, डॉ. मनोहर तांबुलकर, अब्दुल शकील, पंकज थोरात, गोपाल पटटम, पंकज निघोट, किशोर गीद, दिनेश तराळे, सुनील पाटील, संदीप सहारे, वासुदेव ढोके, प्रज्ञा बडवाईक, चंद्रकांत हिंगे, आकाश तायवाडे, पुरुषोत्तम लोणारे, अशोक निखाडे, अॅड. अभय रणदिवे, इरशाद मलिक, मनीष उमरेडकर, गणेश शाहू, अर्जुनसिंग परिहर, हरविदरसिंग लोहिया, स्नेहल दहीकर आदी उपस्थित होते.