शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
2
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
3
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
4
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
5
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
6
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
7
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
8
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
9
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
11
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
12
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
13
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
14
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
15
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
16
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
17
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
18
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
19
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
20
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:10 IST

सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले.

ठळक मुद्दे१९३३ मध्ये महात्मा गांधी यांच्या पुढाकारतून खोदली विहीर : बोरकरनगरातील सफाई कामगारांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. विशेष म्हणजे, १२ दिवसाच्या श्रमदानातून ही विहीर उभी राहिली. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली होती, असे सांगण्यात येते. 'गांधी विहीर' म्हणून आजही या विहिरीची वेगळी ओळख आहे. 

कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधीनागपूरला आले होते. सफाई कामगारांना सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी सफाई कामगारांची वसाहत असलेल्या बोरकरनगरातच विहीर खोदण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळातील आठवणींना उजाळा देत बोरकरनगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले, त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव होता. सफाई कामगारांसाठी स्वतंत्र विहीर खोदण्यासाठी महात्मा गांधी यांनी निर्णय घेतल्याने लोकांमध्ये उत्साह होता. बोरकरनगरातच विहिरी खोदायची असल्याने ती वसाहतीच्या मधोमध असावी असा लोकांचा आग्रह होता. कामगारांनी दिवस-रात्र एक करून केवळ १२ दिवसात विहीर खोदून काढली. विहिरीचे लोकार्पण स्वत: महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुनमचन्द राका व ज्येष्ठ नागरिक जंगलूजी बढेल यांनी या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी हाती घेतली. ही विहीर बोरकरनगरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी जीवनदायी ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध सिनेकलावंत व काँग्रेसचे नेते दिवंगत सुनील दत्त यांनीही या विहिरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांना विहिरीच्या पाण्याद्वारे अंघोळ घालून दिली होती, असेही नागरिक सांगतात.'गांधी विहीर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विशेष विहिरीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी महात्मा गांधी विचार मंचने केली आहे. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विहिरीच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले. परंतु देखभालीअभावी काही वर्षातच सर्वच नष्ट झाले. दरम्यान मनपातर्फे या विहिरीलगत गडर लाईन टाकण्याचे काम झाले. येथील नागरिकांनी याला विरोधही केला, परंतु अधिकाऱ्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. आज या विहिरीला गडरची घाण लागली आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बापूंच्या विहिरीची दुर्दशा झाली आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर