शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

महात्मा गांधी जयंती विशेष:प्रेरणेचे प्रतीक नागपुरातील 'गांधी विहीर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 22:10 IST

सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले.

ठळक मुद्दे१९३३ मध्ये महात्मा गांधी यांच्या पुढाकारतून खोदली विहीर : बोरकरनगरातील सफाई कामगारांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. विशेष म्हणजे, १२ दिवसाच्या श्रमदानातून ही विहीर उभी राहिली. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली होती, असे सांगण्यात येते. 'गांधी विहीर' म्हणून आजही या विहिरीची वेगळी ओळख आहे. 

कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी महात्मा गांधीनागपूरला आले होते. सफाई कामगारांना सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी सफाई कामगारांची वसाहत असलेल्या बोरकरनगरातच विहीर खोदण्यासाठी पुढाकार घेतला. त्या काळातील आठवणींना उजाळा देत बोरकरनगरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले, त्याकाळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव होता. सफाई कामगारांसाठी स्वतंत्र विहीर खोदण्यासाठी महात्मा गांधी यांनी निर्णय घेतल्याने लोकांमध्ये उत्साह होता. बोरकरनगरातच विहिरी खोदायची असल्याने ती वसाहतीच्या मधोमध असावी असा लोकांचा आग्रह होता. कामगारांनी दिवस-रात्र एक करून केवळ १२ दिवसात विहीर खोदून काढली. विहिरीचे लोकार्पण स्वत: महात्मा गांधी यांनी केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुनमचन्द राका व ज्येष्ठ नागरिक जंगलूजी बढेल यांनी या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी हाती घेतली. ही विहीर बोरकरनगरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी जीवनदायी ठरली. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर प्रसिद्ध सिनेकलावंत व काँग्रेसचे नेते दिवंगत सुनील दत्त यांनीही या विहिरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांना विहिरीच्या पाण्याद्वारे अंघोळ घालून दिली होती, असेही नागरिक सांगतात.'गांधी विहीर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या विशेष विहिरीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी महात्मा गांधी विचार मंचने केली आहे. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विहिरीच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले. परंतु देखभालीअभावी काही वर्षातच सर्वच नष्ट झाले. दरम्यान मनपातर्फे या विहिरीलगत गडर लाईन टाकण्याचे काम झाले. येथील नागरिकांनी याला विरोधही केला, परंतु अधिकाऱ्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. आज या विहिरीला गडरची घाण लागली आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बापूंच्या विहिरीची दुर्दशा झाली आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर