शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

'केंद्र सरकारच्या जिवावर शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 12:54 IST

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत.

नागपूरः शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले, आमचं काळजीवाहू सरकार होतं, त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. त्यानंतर आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यासंदर्भातले जीआर काढू शकलो नाहीत.जयंत पाटील म्हणाले आम्ही सहा हजार कोटी रुपये दिले आहेत. 93 लाख हेक्टर जमीन म्हणजे 23 हजार कोटी रुपये किमान हे त्यांनी द्यायला पाहिजे होते. साडेपाच ते सहा हजार कोटी केवळ त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे 25 हजार रुपये हेक्टरानं 23 हजार कोटी रुपये कधी देणार हे आम्ही त्यांना विचारलं आहे. केंद्राकडे सर्व गोष्टी टोलवण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे. केंद्र सरकारचे नियम ठरलेले असतात, आमचेही पाच वर्ष सरकार होतं, केंद्रानं तसे आम्हाला पैसे दिले आहेत. आघाडी सरकारपेक्षा जास्त पैसा हा मोदी सरकारनं राज्याला दिला आहे.पण त्याचे नियम आणि निकष ठरलेले होते. तुम्ही घोषणा करताना स्वतःच्या जिवावर केली होती की केंद्र सरकारच्या जिवावर केली होती, याचंदेखील उत्तर मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांनी दिलं पाहिजे. आपलं अपयश लपवण्याकरिता केंद्र सरकारचं नाव घेणं हे योग्य नाही . आम्ही आमच्या भरवशावर शेतकऱ्यांना मदत दिली होती. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आम्ही राज्याच्या भरवशावर मदत केली आहे. तुमची मागणी होती, तुम्ही किमान समान कार्यक्रम तयार केला. किमान समान कार्यक्रमात अवकाळी शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीचे मुद्दे ठरवण्यात आले होते. पण शेतकऱ्यांना अद्यापही तुम्ही मदत देऊ शकलेला नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन