शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात का भरकटली दिशा? विरोधकांनी संधी का साधली नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 06:09 IST

राजकीय हिशेब चुकते करण्यातच सगळा वेळ पडला खर्ची, जनतेचे प्रश्न चर्चेला येणार तरी कधी?

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील प्रश्न सुटावेत, विदर्भाला न्याय मिळावा, म्हणून करारानुसार नागपूरला हिवाळी अधिवेशन भरवले जाते. सध्या नागपूरला  सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात खरोखरच विदर्भाला न्याय मिळाला का, राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा झाली का? तर याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे. कमजोर विरोधक आणि बिनधास्त सत्ताधारी असे चित्र अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाले. विदर्भाचे प्रश्न सोडून भलत्याच प्रश्नांना सत्ताधारी आणि विरोधकांनीही प्राधान्य दिल्याचे दिसून आले.  जेमतेम दोन आठवडे नागपुरात अधिवेशन चालणार आहे. त्यातही सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले राजकीय हिशेब चुकते करण्यातच आतापर्यंतचा वेळ घालवला आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात चर्चेला येणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

दिशा सालीयन, फोन टॅपिंगवरून गदारोळ   

विधानसभेत विरोधकांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाला जाब विचारला; परंतु, विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारताना नियमांवर बोट ठेवले. त्यानंतर अचानक शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी दिशा सालीयनचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाचे जवळपास दहा आमदार या मुद्द्यावर बोलले. यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. या काळात विरोधक मात्र शांत बसून होते.     जयंत पाटील यांचे निलंबन 

अजित पवार यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचीही चौकशी करा, अशी मागणी केली. यावेळी भास्कर जाधव यांना बोलू द्या, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ती फेटाळली. सत्ताधारी पक्षाच्या दहा आमदारांना बोलू देता मग विरोध पक्षाच्या एका आमदाराला का बोलू दिले जात नाही, यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. त्या गोंधळातच जयंत पाटील यांना अध्यक्षांबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल निलंबित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. 

विदर्भावर चर्चा का नाही?

विरोधकांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करताच मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करायची नाही, विरोधक विदर्भविरोधी आहेत, असा आरोप केला. मात्र, त्यानंतर त्यांच्याच पक्षाने दिशा सालीयान प्रकरणावरून अर्धा दिवस वाया घालवला. नाही म्हणायला विरोधी पक्षाच्या विदर्भावरील ठरावावर भाजप- शिंदे गटाच्या आमदारांची भाषणे झाली. मात्र, विरोधकांचा विदर्भ- मराठवाड्यावरील ठराव मात्र चर्चेलाच येऊ शकला नाही. 

विरोधकांनी संधी का साधली नाही? 

अधिवेशनात चुकीची कामे समोर आणून सरकारला अडचणीत आणण्याची विरोधकांना संधी असते. ही संधी विरोधक साधतही असतात. मात्र, त्यासाठी विरोधी पक्षनेता खमका लागतो. मात्र, विधानसभेत अजित पवार यांचे हे खमके नेतृत्व दिसून आले नाही. अनेकदा संधी असतानाही त्यांनी सत्ताधारी शिंदे- फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचा मोका साधला नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण अधिवेशनभर अजित पवारांच्या या कमजोर भूमिकेचीच चर्चा होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन