शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

महाविकास आघाडीचे सरकार बेईमानीचे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 17:13 IST

जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नरखेड तालुक्यतील खैरगाव येथील सभेत बोलत होते.

नरखेड (नागपूर) : महाराष्ट्रातील सरकार बेईमानाचे सरकार आहे. आम्ही निवडणुकीत प्रथम क्रमांक मिळविला तरी सरकार बाहेर आहे. शिवसेनेने दुसऱ्या पक्षांसोबत संसार थाटला. हे सरकार सहा महिन्यात खाली येणार. शेतकऱ्याला अतिरिक्त नुकसान भरपाई दिली नाही. कर्ज माफीत फसवेगीरी केली असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

५० लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी भाजपने मागील पंचवार्षिक योजनेत केली होती. परंतु या सरकारने सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेले शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. शिवसेनेने शिव भोजन थाळी काढली. महाराष्ट्रातील फक्त १८ हजार लोकांना याचा फायदा होणार आहे. हा आघाडी सरकारचा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नरखेड तालुक्यतील खैरगाव येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाकरिता भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येणे गरजेचे आहे. त्याकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आव्हान त्यांनी मतदारांना केले. सभेला माजी मंत्री परिणय फुके, राजीव पोतदार यांनी मार्गदर्शन केले. ऊकेश चौहान, मोवाड न.प .अध्यक्ष सुरेश खसारे इस्माईल शेख उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी