शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

महाविकास आघाडीचे सरकार बेईमानीचे; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 17:13 IST

जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नरखेड तालुक्यतील खैरगाव येथील सभेत बोलत होते.

नरखेड (नागपूर) : महाराष्ट्रातील सरकार बेईमानाचे सरकार आहे. आम्ही निवडणुकीत प्रथम क्रमांक मिळविला तरी सरकार बाहेर आहे. शिवसेनेने दुसऱ्या पक्षांसोबत संसार थाटला. हे सरकार सहा महिन्यात खाली येणार. शेतकऱ्याला अतिरिक्त नुकसान भरपाई दिली नाही. कर्ज माफीत फसवेगीरी केली असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

५० लाख शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी भाजपने मागील पंचवार्षिक योजनेत केली होती. परंतु या सरकारने सातबारा कोरा करण्याचे वचन दिले होते. ऑक्टोबरमध्ये नुकसान झालेले शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत बसत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला. शिवसेनेने शिव भोजन थाळी काढली. महाराष्ट्रातील फक्त १८ हजार लोकांना याचा फायदा होणार आहे. हा आघाडी सरकारचा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मदत केली, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नरखेड तालुक्यतील खैरगाव येथील सभेत बोलत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाकरिता भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येणे गरजेचे आहे. त्याकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आव्हान त्यांनी मतदारांना केले. सभेला माजी मंत्री परिणय फुके, राजीव पोतदार यांनी मार्गदर्शन केले. ऊकेश चौहान, मोवाड न.प .अध्यक्ष सुरेश खसारे इस्माईल शेख उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी