शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच - भागवत कराड

By योगेश पांडे | Updated: October 11, 2023 16:53 IST

केंद्राच्या योजनांबाबत खासगी बॅंकांकडून हवा तसा प्रतिसाद नाहीच

नागपूर : केंद्र शासनाने लहान व्यावसायिक, पथविक्रेते यांच्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अद्यापही मागेच आहे. देशात राज्याचा सातवा क्रमांक असून याबाबत वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. नागपुरात बुधवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

शेतकरी, उद्योजक, पथविक्रेते यांच्यासह इतरही घटकांना अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक योजना केंद्र सरकारकडून बँकांच्या माध्यमातून राबवल्या जातात. यात राष्ट्रीयकृत बँकांकडून योगदान करण्यात येत आहेच. मात्र खासगी बॅंकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळलेला नाही. यासंदर्भात लवकरच या बॅकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक ते निर्देश जारी करण्यात येतील, असे कराड यांनी स्पष्ट केले.

१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते

सद्यस्थितीत देशात ५० कोटींहून अधिक नागरिकांचे जनधन योजनेअंतर्गत बॅंक खाते उघडण्यात आले आहे. या खात्यांमध्ये २ लाख ४ हजार ४८२ कोटी रुपये आहेत. जनतेचा या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते असावे अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाचे बॅंक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर मतदार यादीच्या आधारे बॅंक खाती सुरू करण्याच्या सूचनादेखील बॅंकांना देण्यात आल्या आहेत, असे कराड यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत

जगातील अनेक देश आर्थिक संकटांचा सामना करत असले तरी भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. गोरगरीब नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान मुद्रा लोनअंतर्गत ४३ लाख कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकादेखील फायद्यात असून या वर्षातील नफ्याचा आकडा १.०४ लाख कोटी इतका आहे.. बॅंकाचा एनपीए ११ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतnagpurनागपूर