शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

काँग्रेसच्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा; आमदारांची सोनिया गांधीकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 12:14 IST

असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे १०० आमदार कसे निवडून येणार, असा प्रश्न आमदारांनी सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला.

कमलेश वानखेडे

नागपूर :काँग्रेसचे मंत्री आमदारांना विश्वासात घेत नाहीत. विकास कामांबाबत विचारत नाही. पालकमंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. काही मंत्र्यांचा तोरा वाढला असून जनतेशी वागणूकही बदलली आहे. अशा मंत्र्यांना एकतर पदावरून दूर करा किंवा त्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी करीत आमदारांनीसोनिया गांधी यांच्याकडे मंगळवारी रात्री तक्रारींचा पाढा वाचला. आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे सोनिया गांधी यांनी आमदारांना आश्वस्त केले.

काँग्रेसच्या ३१ आमदारांनी मंगळवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन ते तीन वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ आमदारांनी यावेळी थेट मंत्र्यांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी व शिवसेनेचे मंत्री महिन्यातून एकदा त्यांच्या आमदारांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेतात. काँग्रेसचे मंत्री मात्र तसे करत नाहीत. सीएलपी मिटिंगही नियमित होत नाही. मंत्र्यांनी किमान त्यांच्या मंत्रालयात अडलेली कामे मार्गी लावावी. मात्र, मंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. ते स्वत:च्या मंत्रिपदातच खूश आहेत. महामंडळांवरील नियुक्ती अद्याप झालेल्या नाहीत, अशा तक्रारींचा पाढाच आमदारांनी वाचला. असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे १०० आमदार कसे निवडून येणार, असा प्रश्न आमदारांनी सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला. सोनिया गांधी यांनी सर्व मुद्दे ऐकून घेत यावर उपाय योजण्याचे आश्वासन दिले, असे एका ज्येष्ठ आमदाराने लोकमतशी बोलताना सांगितले.

सोनिया गांधी यांना भेटलेल्या आमदारांमध्ये संग्राम थोपटे, कुणाल पाटील, अमीन पटेल, कैलास गोरंट्याल, अमित झनक, सुभाष धोटे, विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अमर राजूरकर, बळवंत वानखेडे, मोहन हंबर्डे, राजेश राठोड, राजू पारवे, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, विक्रम सावंत, संजय जगताप, पी.एन. पाटील, शिरीष नाईक, शिरीश चौधरी, प्रज्ञा सातव, राजेश एकडे, लहु कानडे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMLAआमदार