शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बाहेरच्या राज्यातून राज्यसभेच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नाराज; म्हणाले, अजूनही वेळ आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 17:25 IST

Rajya Sabha Election: इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात नाराजी, बदल व्हावा यासाठी आपण पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

ठळक मुद्देवासनिक महाराष्ट्रातून तर प्रतापगढी उत्तर प्रदेशातून हवे - पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : राज्याबाहेरच्या नेत्यांना दुसऱ्या राज्यातून राज्यसभेची उमेदवारी देण्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या-ज्या वेळी बाहेरच्या राज्यातून उमेदवारी दिली जाते त्या-त्या वेळी संबंधित राज्यात नाराजी होत असते. मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून तर इम्रान प्रतापगढी यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी द्यावी व तसा बदल करावा, अशी विनंती आपण पक्षश्रेष्ठींना केली होती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, मुकुल वासनिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर आपण त्यांचे अभिनंदन केले. मात्र, मी त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी घेण्याचा सल्ला दिला. यामुळं त्यांचा नागपूर आणि विदर्भात संपर्क कायम राहील. तसेच इमरान प्रतापगढी यांनी उत्तर प्रदेश मधून अर्ज भरावा, असा बदल करावा असे माझे मत आहे. मात्र हा केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांनी विचारपूर्वक ही उमेदवारी दिली असेल. असे का करण्यात आले हे आपल्या आकलनापलिकडे आहे. मात्र, अजूनही वेळ आहे. त्यामुळे या दोन राज्यसभांच्या उमेदवारीमध्ये बदल केला पाहिजे असं माझं मत असून ही उमेदवारी बदलली जावी. हा विषय आपण पक्षश्रेष्ठींकडे पोहचविला आहे. यासंदर्भात एक बैठक होती, मात्र ती रद्द झाली, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत काँग्रेसला डावलले जात आहे

- महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसला डावलले जातेय हे खरे आहे. मात्र सध्या काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नेत्यांनी लढत राहिले पाहिजे, यात अवघड नाही. आघाडीतुन काँग्रेस बाहेर पडणार नाही, मात्र संवाद वाढविला पाहिजे, समन्वय वाढविला पाहिजे, अशी सूचना चव्हाण यांनी केली.

खाते कुणाकडेही असले तरी निधी समान।दिला।पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. नाराजी वाढत आज. याला वाचा फोडली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण