शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाहेरच्या राज्यातून राज्यसभेच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नाराज; म्हणाले, अजूनही वेळ आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 17:25 IST

Rajya Sabha Election: इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात नाराजी, बदल व्हावा यासाठी आपण पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

ठळक मुद्देवासनिक महाराष्ट्रातून तर प्रतापगढी उत्तर प्रदेशातून हवे - पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : राज्याबाहेरच्या नेत्यांना दुसऱ्या राज्यातून राज्यसभेची उमेदवारी देण्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या-ज्या वेळी बाहेरच्या राज्यातून उमेदवारी दिली जाते त्या-त्या वेळी संबंधित राज्यात नाराजी होत असते. मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून तर इम्रान प्रतापगढी यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी द्यावी व तसा बदल करावा, अशी विनंती आपण पक्षश्रेष्ठींना केली होती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, मुकुल वासनिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर आपण त्यांचे अभिनंदन केले. मात्र, मी त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी घेण्याचा सल्ला दिला. यामुळं त्यांचा नागपूर आणि विदर्भात संपर्क कायम राहील. तसेच इमरान प्रतापगढी यांनी उत्तर प्रदेश मधून अर्ज भरावा, असा बदल करावा असे माझे मत आहे. मात्र हा केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांनी विचारपूर्वक ही उमेदवारी दिली असेल. असे का करण्यात आले हे आपल्या आकलनापलिकडे आहे. मात्र, अजूनही वेळ आहे. त्यामुळे या दोन राज्यसभांच्या उमेदवारीमध्ये बदल केला पाहिजे असं माझं मत असून ही उमेदवारी बदलली जावी. हा विषय आपण पक्षश्रेष्ठींकडे पोहचविला आहे. यासंदर्भात एक बैठक होती, मात्र ती रद्द झाली, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत काँग्रेसला डावलले जात आहे

- महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसला डावलले जातेय हे खरे आहे. मात्र सध्या काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नेत्यांनी लढत राहिले पाहिजे, यात अवघड नाही. आघाडीतुन काँग्रेस बाहेर पडणार नाही, मात्र संवाद वाढविला पाहिजे, समन्वय वाढविला पाहिजे, अशी सूचना चव्हाण यांनी केली.

खाते कुणाकडेही असले तरी निधी समान।दिला।पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. नाराजी वाढत आज. याला वाचा फोडली पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण