शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:19 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. काँग्रेसकडून टीका केली जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी आज या मुद्यावर काँग्रेसवर टीकाही केली. या टीकेबाबत पत्रकारांनी मनीष तिवारी यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठलेही योगदान न देणारे आज देशभक्ती शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी खा. तिवारी यांनी भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. भाजपने पाच वर्षांत खरंच चांगले काम केले तर मग ते त्या कामावर मत का मागत नाहीत. त्यांना भावनात्मक मुद्यांची गरज का पडत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या काळात दोन मोठे जागतिक आर्थिक संकट ओढवले होते. परंतु त्याची साधी झळसुद्धा भारताला पोहचू दिली नव्हती. परंतु मोदी यांच्या केवळ पाच वर्षांत कुठलीही जागतिक मंदी नसताना भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली. ही मानवनिर्मित आहे. मुळात मोदी सरकारला अर्थव्यवस्था चालवताच येत नाही, अशी टीकाही खा. तिवारी यांनी केली.जनतेचा पैसा बँकेत सुरक्षित नाहीजनतेचा मेहनतीने कमावलेला पैसा आज बँकेत सुरक्षित नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या देशातील नागरिकांचाच पैसा सुरक्षित नाही, तिथे आमची गुंतवणूक सुरक्षित कशी राहील, या विचाराने कुणीही भारतात गुंतवणूक करायला तयार नाही. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेने आळा घातला नाही तर देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईस जाईल की मग ती रुळावर येऊ शकणार नाही? अशी भीतीही खा. मनीष तिवारी यांनी वर्तविली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसMediaमाध्यमे