शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:19 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. काँग्रेसकडून टीका केली जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी आज या मुद्यावर काँग्रेसवर टीकाही केली. या टीकेबाबत पत्रकारांनी मनीष तिवारी यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठलेही योगदान न देणारे आज देशभक्ती शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी खा. तिवारी यांनी भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. भाजपने पाच वर्षांत खरंच चांगले काम केले तर मग ते त्या कामावर मत का मागत नाहीत. त्यांना भावनात्मक मुद्यांची गरज का पडत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या काळात दोन मोठे जागतिक आर्थिक संकट ओढवले होते. परंतु त्याची साधी झळसुद्धा भारताला पोहचू दिली नव्हती. परंतु मोदी यांच्या केवळ पाच वर्षांत कुठलीही जागतिक मंदी नसताना भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली. ही मानवनिर्मित आहे. मुळात मोदी सरकारला अर्थव्यवस्था चालवताच येत नाही, अशी टीकाही खा. तिवारी यांनी केली.जनतेचा पैसा बँकेत सुरक्षित नाहीजनतेचा मेहनतीने कमावलेला पैसा आज बँकेत सुरक्षित नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या देशातील नागरिकांचाच पैसा सुरक्षित नाही, तिथे आमची गुंतवणूक सुरक्षित कशी राहील, या विचाराने कुणीही भारतात गुंतवणूक करायला तयार नाही. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेने आळा घातला नाही तर देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईस जाईल की मग ती रुळावर येऊ शकणार नाही? अशी भीतीही खा. मनीष तिवारी यांनी वर्तविली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसMediaमाध्यमे