शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : कलम ३७० वर राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट करावी  : अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:26 IST

परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा लावला आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कखापरखेडा (नागपूर) : देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ‘कलम ३७०’च्या मुद्यावरून हल्लाबोल केला. काँग्रेसने ‘कलम ३७०’ हटविण्याला विरोध केला आहे. जर परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच शहा यांनी दिले. सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. राजीव पोतदार व कामठी मतदारसंघातील उमेदवार टेकचंद सावरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.

खापरखेड्याजवळील चनकापूर येथे झालेल्या महाजनादेश संकल्प सभेदरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री व भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे, अशोक मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. अगोदर दहशतवादी हल्ला झाल्यावर केवळ निंदा व्हायची. मात्र ५६ इंच छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. आता दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना मारले जाते. असे केवळ अमेरिका व इस्रायल हेच देश करायचे. आता भारतदेखील त्या पंक्तीत जाऊन बसला आहे. देशाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना पोटशूळ उठला. ते ‘व्होटबँक’ राजकारण करीत आहे. मात्र आमच्यासाठी सत्तेहून देशहित मोठे आहे. काश्मीरमध्ये एकही गोळी चालली नाही व स्थिती शांतीपूर्ण आहे. काँग्रेसचे नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असा आरोप शहा यांनी लावला. 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचा सन्मान आहेत. त्यांचा अपमान करण्याची काँग्रेस नेत्यांची हिंमत कशी होते, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील देशभक्तांची टोळी व दुसरीकडे राहुल गांधी-शरद पवार यांच्या घराणेशाहीचा कंपू असे चित्र आहे. आघाडी शासनाच्या काळात रसातळाला गेलेल्या महाराष्ट्राला पाच वर्षांत पहिल्या पाच क्रमांकात आणल्या गेले आहे.पवारांना ‘भाजयुमो’चे पदाधिकारी हिशेब देतीलयावेळी अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शरद पवार यांच्या पक्षाने केवळ भ्रष्टाचारच केला. पवार यांनी नागपुरातील कुठल्याही चौकात येऊन त्यांच्या कार्यकाळातील १५ वर्षांच्या कामाचा हिशेब द्यावा. आमच्या ‘भाजयुमो’चा कुठलाही तरुण पदाधिकारी त्यांना मागील पाच वर्षांच्या कामाचा हिशेब देईल, असे शहा म्हणाले. अजित पवार यांनी सिंचनासाठी ७२ हजार कोटी खर्च केले, मात्र एक ‘हेक्टर’देखील सिंचन होऊ शकले नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १९ हजार गावांना जलसंपन्न केले, असेदेखील शहा म्हणाले.शहा यांनी बावनकुळे यांच्या खात्याचे केले कौतुकयावेळी अमित शहा यांनी राज्यात झालेल्या कामांची यादीच वाचून दाखविली. यात समृद्धी महामार्ग योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सिंचन योजना, जलयुक्त शिवार, शिक्षणक्षेत्रातील प्रगती इत्यादींचा समावेश होता. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऊर्जाखात्याच्या कामाचेदेखील कौतुक केले. वीजउत्पादन वाढविण्यासोबतच राज्य लोडशेडिंगमुक्त झाले आहे, असे शहा म्हणाले. पाच वर्षांतील कामांची यादी पूर्णपणे वाचली तर सात दिवसांचा भागवत सप्ताहच होईल, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाsavner-acसावनेरkamthi-acकामठी