शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 22:11 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर उमेदवार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विमानतळावर मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट आर्वीकडे रवाना झाले.वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे निवडणूक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांचे दुपारी १.१५ वाजता विमानतळावर आगमन झाले. १.२० वाजता बेल्ट क्रमांक १ वर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी एकेक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक विधानसभा निहाय काँग्रेसची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जिल्ह्यातील पक्षाची एकूण स्थितीची त्यांना माहिती दिली. काँग्रेस उमेदवारांशिवाय माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश सचिव अतुल कोटेचा व मुजीब पठाण, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, नितीन कुंभलकर, बबनराव तायवाडे, के. के. पांडे, अभिषेकवर्धन सिंह आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जवळपास १७ मिनिट चर्चा केली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यांच्यासोबत प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांच्या नावांची एक यादी काँग्रेसतर्फे सुरक्षा रक्षकांना सोपवण्यात आली होती. परंतु काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. शेळके यांनी फोन लावला. मल्लिकार्जुन खरगे यांना माहिती होताच ते बाहेर आले आणि शेळके यांना आत घेऊन गेले.पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथाराहुल गांधी यांच्यासमोर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांनी अल्पसंख्याकांना एकही जागा न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रकारे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी महिलांना प्रतिनिधित्व न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राहुल गांधी यांनी त्यांना थोरात व खरगे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर