शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : राहुल गांधी यांनी जाणून घेतली काँग्रेसची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 22:11 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देनागपूर विमानतळावर उमेदवार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत विधानसभा निवडणुकीत पक्षाची एकूण स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विमानतळावर मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते उपस्थित होते. राहुल गांधी विमानतळावरून हेलिकॉप्टरने थेट आर्वीकडे रवाना झाले.वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे निवडणूक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांचे दुपारी १.१५ वाजता विमानतळावर आगमन झाले. १.२० वाजता बेल्ट क्रमांक १ वर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी एकेक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रत्येक विधानसभा निहाय काँग्रेसची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे व ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जिल्ह्यातील पक्षाची एकूण स्थितीची त्यांना माहिती दिली. काँग्रेस उमेदवारांशिवाय माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश सचिव अतुल कोटेचा व मुजीब पठाण, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, नितीन कुंभलकर, बबनराव तायवाडे, के. के. पांडे, अभिषेकवर्धन सिंह आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जवळपास १७ मिनिट चर्चा केली. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यांच्यासोबत प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांच्या नावांची एक यादी काँग्रेसतर्फे सुरक्षा रक्षकांना सोपवण्यात आली होती. परंतु काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. शेळके यांनी फोन लावला. मल्लिकार्जुन खरगे यांना माहिती होताच ते बाहेर आले आणि शेळके यांना आत घेऊन गेले.पदाधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथाराहुल गांधी यांच्यासमोर काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. माजी शहराध्यक्ष शेख हुसैन यांनी अल्पसंख्याकांना एकही जागा न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रकारे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनी महिलांना प्रतिनिधित्व न दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राहुल गांधी यांनी त्यांना थोरात व खरगे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधीDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर