शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 19:54 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले.

ठळक मुद्देदाखल एकही नाही : निवडणूक विभागात कार्यकर्त्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित आणि दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बाराही विधानसभेत एकूण १७६ उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले. सर्वाधिक ३३ उमेदवारी अर्ज उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून नेण्यात आले तर सर्वात कमी ३ अर्ज उमरेड विधानसभा मतदार संघातून गेले.

विधानसभा निवडणुकीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. निवडणूक अर्ज वितरित करणे आणि वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात असलेल्या शहरातील विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विभागीय कार्यालयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. एक उमेदवाराला चार अर्ज नेता येतात. पहिल्या दिवशी नागपूर शहरातील ११६ अर्ज गेले तर ग्रामीण भागातून ६० अर्ज गेले. परंतु एकानेही अर्ज दाखल केला नाही. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.नागपूर दक्षिण-पश्चिम - १५नागपूर दक्षिण : २३नागपूर पश्चिम : १५नागपूर पूर्व : १०नागपूर मध्य : २०उत्तर नागपूर : ३३कामठी : ७हिंगणा : १३उमरेड : ३काटोल : १०सावनेर : ९रामटेक : १८-----------------------एकूण १७६जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे स्वरूप 
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथककडून जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचे रूप आले आहे.दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ४ ऑक्टोबर ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे. ४ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ५ तारखेला अर्जाची छाननी होईल. ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर