शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:51 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

ठळक मुद्देभाजप निवडणूक भावनात्मक करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. भाजप कितीही भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असला तरी काँग्रेस मात्र जनतेशी निगडित दैनंदिन मुद्यांवरच निवडणूक लढवेल आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.खरगे आणि थोरात यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे संयुक्त पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आम्ही येथील स्थानिक मुद्यावरच बोलत आहोत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता कितीतरी मागे गेला आहे. शेतकरी आत्महत्या विदर्भात सर्वाधिक होत आहेत. कृषी विकास दर हा नेहमीच साडेचार ते ५ टक्के राहिला आहे. परंतु तो खाली येऊन २.४ टक्केवर आला आहे. कृषी उत्पादनही घटले आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे. हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. लोकांनाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.६० वर्षाचा हिशेब मागणारे त्यांचे केवळ पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड का सादर करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार जाहिरातबजी करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा दुप्पट होणारकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेस महाआघाडीला चांगले यश मिळेल. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. नवीन रोजगार दूरच आहे तो रोजगारही हिरावला जात आहे. त्यामुळे लोकांनाच परिवर्तन हवे आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ४२ व ४१ असे होते. ते यंदा दुप्पट होतील, आणि काँग्रेस महाआघाडीचीच सरकार येईल, असा दावा केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMediaमाध्यमे