शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:51 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

ठळक मुद्देभाजप निवडणूक भावनात्मक करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. भाजप कितीही भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असला तरी काँग्रेस मात्र जनतेशी निगडित दैनंदिन मुद्यांवरच निवडणूक लढवेल आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.खरगे आणि थोरात यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे संयुक्त पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आम्ही येथील स्थानिक मुद्यावरच बोलत आहोत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता कितीतरी मागे गेला आहे. शेतकरी आत्महत्या विदर्भात सर्वाधिक होत आहेत. कृषी विकास दर हा नेहमीच साडेचार ते ५ टक्के राहिला आहे. परंतु तो खाली येऊन २.४ टक्केवर आला आहे. कृषी उत्पादनही घटले आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे. हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. लोकांनाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.६० वर्षाचा हिशेब मागणारे त्यांचे केवळ पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड का सादर करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार जाहिरातबजी करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा दुप्पट होणारकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेस महाआघाडीला चांगले यश मिळेल. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. नवीन रोजगार दूरच आहे तो रोजगारही हिरावला जात आहे. त्यामुळे लोकांनाच परिवर्तन हवे आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ४२ व ४१ असे होते. ते यंदा दुप्पट होतील, आणि काँग्रेस महाआघाडीचीच सरकार येईल, असा दावा केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMediaमाध्यमे