शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
3
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
4
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
5
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
6
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
9
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
10
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
11
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
12
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
13
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
14
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
15
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
17
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
18
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
19
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
20
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस स्थानिक मुद्यांवरच निवडणूक लढणार : खरगे-थोरात यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 21:51 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला.

ठळक मुद्देभाजप निवडणूक भावनात्मक करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महागाई, बेरोजगारी यासारख्या राज्यातील नागरिकांशी निगडित महत्त्वाच्या स्थानिक मुद्यांकडे लक्ष जाऊ नये म्हणून भाजप विधानसभा निवडणुकीत भावनात्मक मुद्दे उपस्थित करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे केला. भाजप कितीही भावनात्मक मुद्दे उपस्थित करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत असला तरी काँग्रेस मात्र जनतेशी निगडित दैनंदिन मुद्यांवरच निवडणूक लढवेल आणि यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.खरगे आणि थोरात यांनी मंगळवारी प्रेस क्लब येथे संयुक्त पत्रपरिषद बोलावली होती. यावेळी खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. लोक काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आम्ही येथील स्थानिक मुद्यावरच बोलत आहोत. महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. तो आता कितीतरी मागे गेला आहे. शेतकरी आत्महत्या विदर्भात सर्वाधिक होत आहेत. कृषी विकास दर हा नेहमीच साडेचार ते ५ टक्के राहिला आहे. परंतु तो खाली येऊन २.४ टक्केवर आला आहे. कृषी उत्पादनही घटले आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अपयशी ठरत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे. हे मुद्दे आम्ही लोकांपुढे मांडत आहोत. लोकांनाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ते सुद्धा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.६० वर्षाचा हिशेब मागणारे त्यांचे केवळ पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड का सादर करीत नाही, असा सवालही त्यांनी केला. भाजप सरकार जाहिरातबजी करून लोकांची दिशाभूल करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा दुप्पट होणारकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काँग्रेस महाआघाडीला चांगले यश मिळेल. कारखाने बंद होत आहेत. बेरोजगारी वाढली आहे. नवीन रोजगार दूरच आहे तो रोजगारही हिरावला जात आहे. त्यामुळे लोकांनाच परिवर्तन हवे आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ४२ व ४१ असे होते. ते यंदा दुप्पट होतील, आणि काँग्रेस महाआघाडीचीच सरकार येईल, असा दावा केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातMediaमाध्यमे