शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:38 IST

महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेने मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदार संघात जनसंपर्क करीत असताना भाजप सरकारविरोधी जनआक्रोश सर्वत्र दिसून येत आहे. महागाई, सरकारची चुकीची धोरणे व या परिसराकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेमध्ये रोष आहे, असे वक्तव्य दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.सुभाषनगर, अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, गांधीनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, तकिया, धंतोली या मार्गालगतच्या परिसरात आशिष देशमुख यांनी सोमवारी प्रचार केला. या जनसंपर्क दौऱ्यात गृहिणी, छोटे व्यापारी, बेरोजगार युवक-युवती, मजुरांनी त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी दंतेश्वरी व धनगरपुरा झोपडपट्टी, आॅरेंजसिटी, खामला येथे पदयात्रा व रात्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची जाहीर सभाही पार पडली.या सरकारने दक्षिण-पश्चिम क्षेत्राचा काहीच विकास केला नाही. फक्त घोषणा केल्या, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. नागपुरातील महिलांची सुरक्षा वाढवून सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणे, गृहोद्योगासाठी विशेष प्रशिक्षण, गुन्हेगारीवर आळा, नागपूरमध्ये महिला पोलिसांची संख्या वाढविणे, घनकचºयाची इकोफ्रेंडली विल्हेवाट, दूषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा, झोपडपट्टीमधील नाल्या, पाण्याचे लिकेज बंद करणे व रस्ते दुरुस्ती, उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक व रोजगारनिर्मिती, नागपूर शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करून औद्योगिक नगरी व आर्थिक विकासावर भर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २१ व्या शतकातील जागतिक दर्जाच्या सुविधा जनतेला उपलब्ध करून देणे, हा आपला संकल्प असल्याचे डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी जाहीर केले. २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनाचे उत्तर सरकारकडे नाही, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम