शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:52 IST

भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देचंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिणमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ मंगळवारी चंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, रमेश पिसे, अरुण गाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर म्हणाले, देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की, सरकारला रिझर्व्ह बँकेकडून पैसे घ्यावे लागत आहे. देशाला हजारो-लाखो कोटी रुपयांचा नफा कमवून देणाऱ्या नवरत्न कंपन्या विकायल्या काढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अंबानीच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर परिवर्तन करावे लागेल. महाराष्ट्राचीही पत घसरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आज तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर गेले आहे. राज्यावर पाच लाख कोटीचे कर्ज आहे. दोन कोटी रोजगार हिरावल्या गेले आहेत. लोकांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजप बहुमताने निवडून येण्याचा दावा मुख्यमंत्री करतात. त्यांना विजयाची इतकीच खात्री आहे तर मग प्रचारासाठी पंतप्रधानांपासून सर्व मंत्री आणि देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना का बोलवावे लागत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम