शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Maharashtra Assembly Election 2019 : भाजपने चुकीची धोरणे राबविली : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:52 IST

भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.

ठळक मुद्देचंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपने मागील पाच वर्षांत चुकीचे धोरण राबवून प्रगतिपथावर असलेला आपला देश भिकेला लावला असल्याची जाहीर टीका रिपब्लिकन सेनाचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली.वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिणमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ मंगळवारी चंद्रमणीनगर उद्यानजवळ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, रवि शेंडे, रमेश पिसे, अरुण गाडे प्रामुख्याने उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर म्हणाले, देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. परंतु आज परिस्थिती अशी झाली आहे की, सरकारला रिझर्व्ह बँकेकडून पैसे घ्यावे लागत आहे. देशाला हजारो-लाखो कोटी रुपयांचा नफा कमवून देणाऱ्या नवरत्न कंपन्या विकायल्या काढल्या आहेत. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अंबानीच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर परिवर्तन करावे लागेल. महाराष्ट्राचीही पत घसरली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य आज तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर गेले आहे. राज्यावर पाच लाख कोटीचे कर्ज आहे. दोन कोटी रोजगार हिरावल्या गेले आहेत. लोकांना मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजप बहुमताने निवडून येण्याचा दावा मुख्यमंत्री करतात. त्यांना विजयाची इतकीच खात्री आहे तर मग प्रचारासाठी पंतप्रधानांपासून सर्व मंत्री आणि देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना का बोलवावे लागत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम