शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

‘माघारी’ने काँग्रेसमध्ये नाराजी

By admin | Updated: December 13, 2015 02:50 IST

विधान परिषदेची मुंबईतील भाई जगताप यांची जागा सेफ करण्यासाठी काँग्रेसने भाजपशी तह करीत नागपुरात माघार घेतली.

व्यास बिनविरोध, भाजपचा जल्लोष : काँग्रेस नेत्याच्या गुप्तभेटीचीच चर्चानागपूर : विधान परिषदेची मुंबईतील भाई जगताप यांची जागा सेफ करण्यासाठी काँग्रेसने भाजपशी तह करीत नागपुरात माघार घेतली. पक्षाचा हा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. मुंबईसाठी नागपूरचा बळी का, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार चालणारी ही निवडणूक बिनाधक्क्याने आटोपल्यामुळे भाजप वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे संख्याबळ भाजपकडे होते. मात्र, शिवसेनेसह मित्रपक्षांची धाकधूक होती. दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांनी ‘ताकदीने’ रिंगणात उतरण्याची तयारी चालविली होती. संख्याबळ नसतानाही राजेंद्र मुळक यांनी चक्र फिरविले होते, हा या निवडणुकीचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची शुक्रवारी रात्री वर्धा रोडवरील बड्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर ग्रामीणमधील काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची हॉटेलमध्ये जाऊन गुप्त भेट घेतली. मात्र, भाजपच्या बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना याची हवा लागली. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषनागपूर : सकाळपर्यंत या ‘गुप्त’ भेटीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. या भेटीत संबंधित काँग्रेस नेत्याने उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची हमी दिली. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा भाजप पदाधिकारी सकाळपासूनच करीत होते. काँग्रेस वर्तुळातून या घडामोडीची माहिती प्रदेशाध्यक्षांनाही कळविण्यात आली. शेवटी मुंबईत भाजपने माघार घेतल्याने नागपुरात काँग्रेसची उमेदवारी मागे घ्या, असा आदेश प्रदेश काँग्रेसकडून आला व काँग्रेसजनांना नांगी टाकावी लागली. गिरीश व्यास यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी धंतोली कार्यालयासह बडकस चौकात आनंदोत्सव साजरा केला. नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यास यांना शुभेच्छा दिल्या. व्यास यांनी वाड्यावर जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व आभार व्यक्त केले. यानंतर व्यास यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांचे आशीर्वाद घेतले. रविवारी टिळक पुतळा कार्यालयात सकाळी ११ वाजता भाजप नेते व कार्यकर्ते एकत्रित येत जल्लोष करणार आहेत. (प्रतिनिधी)मुळकांना होती दगाफटक्याची भीतीभाजपच्या हाती गेलेली विधान परिषदेची ही जागा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी खेचून आणली होती. मात्र, या वेळी मुळक यांनी लढण्यास नकार दिला. मुळक यांना पक्षाने मंत्रिपद दिले, पण त्यानंतरही मुळक यांनी पळ काढला, असा ठपका काँग्रेस नेत्यांकडून ठेवण्यात आला. मात्र, आज झालेली घडामोड पाहता मुळक समर्थकांना कंठ फुटला. मुळक यांच्या विरोधात काही काँग्रेस नेत्यांनी भाजपशी पडद्यामागे हात मिळवणी केली होती. याचा वेळीच अंदाज आल्यामुळेच मुळक लढले नाहीत. ग्रामीणमधील काँग्रेस नेत्याने भाजप नेत्यांशी घेतलेल्या गुप्त भेटीनंतर हे स्पष्ट होते, असे काँग्रेसच्या माघारीनंतर मुळक समर्थक छाती ठोकून सांगत होते. मतदारांच्या पदरीही ‘दुष्काळ’४विधान परिषदेची निवडणूक म्हटले की मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. बहुतांश मतदारांना तर या निवडणुकीचे डोहाळे लागतात. कुणी गाडी खरेदीचे, फॉरेन टूरचे तर कुणी स्वत:च्या निवडणुकीच्या खर्चाची तरतूद करण्याचे स्वप्न रंगवतात. या वेळी भाजपने गिरीश व्यास व काँग्रेसने फारसे परिचित नसलेले अशोकसिंग चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतदारांचे भाव आधीच पडले होते. मात्र, निवडणूक झाली तर फुल ना फुलाची पाकळी वाट्याला येईल, अशी अनेकांना आशा होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याने आशा लावून बसलेल्या मतदारांची पुरती निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळ आहे, पण आता खऱ्या अर्थाने आपल्यालाही ‘दुष्काळा’चे चटके सहन करावे लागतील, अशी चर्चा मतदार नगरसेवकांमध्ये रंगली होती.