शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

‘मै तो तेरे प्यार मे दिवाना हो गया...’

By admin | Updated: February 8, 2015 01:14 IST

नागपूरच्या संत्र्यासोबतच स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कलावंत, उद्योगपती यांचीही नगरी नागपूर आहे, असे मत व्यक्त करीत सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी शनिवारी तिरपुडे कॉलेज

कैलाश खेर यांच्या गीतांची रंगत : कैलाश यांनी विजय दर्डा यांचे केले मंचावरून स्वागत नागपूर : नागपूरच्या संत्र्यासोबतच स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कलावंत, उद्योगपती यांचीही नगरी नागपूर आहे, असे मत व्यक्त करीत सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी शनिवारी तिरपुडे कॉलेज मैदानात एकापेक्षा एक लोकप्रिय गीते सादर करून नागपूरकर रसिकांना जिंकले. ‘मोहे पिया मिलन की आस..’ ते ‘अल्लाह के बंदे...’ पर्यंतचा हा प्रवास नागपूरकरांना आनंद देणारा ठरला. नागपूरकर रसिकांविषयीचे प्रेम करताना त्यांनी ‘मै तो तेरे प्यार मे दिवाना हो गया...’ हे गीत सादर केले आणि रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देत कैलाश यांना प्रतिसाद दिला. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने कैलाश खेर नाईट या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले. अनेक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून त्यांने रसिकांना जिंकले. मंचावर येताच रसिकांना अभिवादन करून कैलाश यांनी ‘जोगी मेरा रंग रंगीला..., नी मै जाणा...’ या गीताने रसिकांची दाद घेतली. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांचे कैलाश खेर यांनी मंचावरूनच अभिवादन करून स्वागत केले. यावेळी कैलाश म्हणाले, नागपुरात येतो तेव्हा येथे लहान भारताचेच दर्शन होते. नागपूर, पुणे, इंदोर येथे जो गायक यशस्वी होतो तोच खरा गायक असतो. येथील संत्रे आणि रसिक दोन्हीही उत्साह वाढवितात. कैलाशा ग्रुपची स्थापना २००४ साली करण्यात आली. यानंतर त्यांनी गीतांची एक मालिकाच सादर केली. ‘ओ पिया, ओ पिया..., रंग दिनी रंग दिवी..., तेरे बिना नही लगता दिल मेरा ढोलना..., प्रीत की लत ऐसी लागी हो गई रे मै मतवाली..., केसे बताएं कि तुझको चाहूं...’ आदी गीतांनी त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी त्यांनी काही मुलींना रंगमंचावर बोलावून नृत्य करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी काही युवतींनी ‘जोगन चली गए...’ या गीतावर तुफान नृत्य केले. पंजाबी तडका देत त्यांनी ‘पंजाबिया डा ढोल बजदा...’ हे गीत सादर केले. यावेळी कैलाश ग्रुपच्या सदस्यांनी तबला. ढोल आणि ड्रम्सची अनोखी जुगलबंदी सादर केली. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर कैलाश यांनी ‘तौबा तौबा रे..., या रब्बा दे दे काई जान भी अगर...,’ आदी गीते सादर केली. कार्यक्रमात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सर्व उपस्थित अतिथींचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनूपकुमार, पोलीस आयुक्त के. के. पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, संयुक्त आयुक्त अनुपकुमार सिंह, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, सीबीआयचे सुपरिटेंडेट संदीप तामगाडगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)