शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लबाड लांडग्याच्या संशोधनाबाबतही ‘लबाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:05 IST

निशांत वानखेडे नागपूर : लाेकपरंपरेत लबाड म्हणून ओळख असलेला आणि बालसाहित्यात अनेक कथांमधून भेटणारा लांडगा (कॅनिस ल्युपस) आता नामशेषच ...

निशांत वानखेडे

नागपूर : लाेकपरंपरेत लबाड म्हणून ओळख असलेला आणि बालसाहित्यात अनेक कथांमधून भेटणारा लांडगा (कॅनिस ल्युपस) आता नामशेषच हाेण्याच्या मार्गावर आहे. गुजरात, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांत वावर असलेल्या लांडग्याची संख्या संपूर्ण देशात जेमतेम २५०० ते ३००० पर्यंत शिल्लक राहिली आहे. कुत्र्याच्या कुळात माेडणारा पण हिंस्र प्राणी म्हणून ओळख आहे. सरकारी पातळीवर कधी संशोधन, सर्वेक्षण न झाल्याने लांडग्याची याेग्य माहितीही मिळणे कठीण आहे.

जगभरात लांडगावर्गीय जातीच्या एकूण ३७ उपजाती आढळतात. भारतात लांडग्यांच्या तीन उपजाती आढळतात. यामध्ये ल्युपस पॅलिपीस हा भारतीय लांडगा, ल्युपस चँको हा तिबेटी लांडगा, तर ल्युपस ल्युपस हा युरोपियन लांडगा आहे. लांडगा, कुत्रा आणि कोल्हा हे तिन्हीही प्राणी सारखे दिसतात. तोंडाकडे निमुळते होत आलेले लांब डोके, टाेकदार उभे कान, झुपकेदार शेपूट व बारीक पाय लांडग्याच्या शरीराची ठेवण असते. महाराष्ट्रातील सगळ्याच जंगलात लांडगे आढळतात. ते गावकुसाबाहेर उघड्या माळरानावर सुद्धा वावरतात. लांडगे दिवसा व रात्री केव्हाही शिकार करतात. दाट जंगलात हरिण, भेकरं, चितळ हे लांडग्याचे खाद्य असते, तर प्रसंगी मोर व इतर पक्षीदेखील लांडग्यांचे सावज बनतात.

- अमेरिकेतील कॅलिफाेर्निया विद्यापीठाचे डेव्हीस यांनी पहिल्यांदाच भारतीय लांडग्याच्या जीनोमचा अभ्यास केला.

- मॉलेक्युलर इकोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेले निष्कर्षानुसार भारतीय लांडगा जगातील सर्वात धोकाग्रस्त प्रजातीत येताे. लांडग्याची संख्या पूर्वीपेक्षा किती तरी जास्त संकटात येऊ शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

- भारतीय लांडगे लांडग्यांच्या प्रजातीत सर्वांत प्राचीन जिवंत वंशाचे प्रतिनिधित्व करतात.

- यूसी डेव्हिस स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिनच्या पर्यावरणशास्त्र संवर्धन युनिटमध्ये डॉक्टरेटची विद्यार्थिनी लॉरेन हेनेली यांच्या मते, ‘लांडगे हे पाकिस्तानमधील शेवटच्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांपैकी एक आहेत आणि भारतातील अनेक मांसाहारी प्राणी धोक्यात आले आहेत.’

- भारतीय लांडगे जे सध्या देशात टिकून आहेत, त्यांचे व गवताळ प्रदेशांच्या संवर्धनासाठी निसर्गप्रेमी, स्वयंसेवी संस्था, वनविभाग ग्रामस्तरावर, महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे.

जंगलाचा कमी होणारा आकार, जंगलात मानवाचा वाढता वावर, अधिवास विखंडन आणि अवनती यातून लांडग्याच्या परिसंस्थेत अनेक प्रतिकूल बदल झालेत. वाघ, बिबट, अस्वलाच्या पंगतीत आपण लांडग्याला स्थान न दिल्यामुळे लांडग्यावर ही वेळ आली आहे. नामशेष होत जाणाऱ्या लांडग्याला अभय मिळाले तर हा जंगलाचा सरदार त्याचे आयुष्य उत्तमरीत्या जगेल. व्याघ्र संवर्धनासह इतर प्राण्यांच्या संवर्धनावरही भर देणे ही काळाची गरज आहे.

- यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ